मुख्य सामग्रीवर वगळा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार जनजागर यात्रेला सौ.अनिताताई खरात यांच्या माध्यमातून सुरुवात,

  इंदापूर 9 मे 2023 रोजी महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे जीआर काढण्यात आला की प्रत्येक ग्रामपंचायतने 31 मे रोजी ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात यावा. त्याप्रमाणे 31 मे 2023 रोजी सर्व ग्रामपंचायत ने हा पुरस्कार महिलांना प्रदान केला ही परंतु लगेच दुसऱ्या वर्षापासून ग्रामपंचायतींना याचा विसर पडला ज्या अहिल्यादेवी होळकरांनी आपले पूर्ण आयुष्य समाजासाठी गोरगरिबांसाठी महिलांसाठी देश हितासाठी दिले त्यांनी कधीही जात-पात धर्म पाहिला नाही त्यांच्या कार्याचा गौरव करणारा पुरस्कार फक्त एक वर्ष देऊन थांबवणे हे कुठेतरी मूर्खपणाचे लक्षण आहे म्हणूनच तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या सौ अनिताताई खरात यांनी इंदापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना या पुरस्काराचे वितरण करण्यासाठी व त्यांना स्मरण करून देण्यासाठी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म वर्षानिमित्त प्रत्येक ग्रामपंचायत च्या ठिकाणी जाऊन सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य जे कोणी उपस्थित असतील त्यांना व गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांना असे लेखी पत्र देण्याचे ठरवले व त्यांनी त्याची सुरुवात आज चाकाटी या गावापासून केली आहे, चाकाटी ग्रामस्थांकडून अनिता ताईंचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले व आम्ही या पुरस्काराचे नक्कीच वितरण करू असा शब्दही देण्यात आला. तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायत ने असा पुरस्कार 31मे 2025 रोजी दिला नाही तर अनिता खरात 31 मे नंतर इंदापूर पंचायत समिती येथे गटशिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर अनिता खरात पुरस्कार न देणाऱ्या ग्रामपंचायतचा निषेध म्हणून त्या ग्रामपंचायतचे नाव बोर्ड वरती लिहून एक दिवसीय लाक्षणीक उपोषण करणार आहेत व त्या ग्रामपंचायतीची तक्रार गटविकास अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहेत, आणि आपल्या तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायतचे नाव बोर्डवर टाकून त्यांचा निषेध करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून त्यांनी अगोदरच असा कडक उन्हाचा पारा असतानाही तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्थळी जाऊन तसे पत्र देण्यासाठी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान पुरस्कार जनजागर यात्रेचे आयोजन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते