मुख्य सामग्रीवर वगळा

*भाऊंचे नेतृत्व व संस्था तुमच्यासाठी टिकल्या पाहिजेत - राजवर्धन पाटील तर राजवर्धन पाटील यांना अश्रू अनावर.भाऊंच्या पाठीशी उभे राहण्याचे केले आवाहन*

इंदापूर:  दि.23/9/24 
                भाऊंचे नेतृत्व व संस्था तुमच्यासाठी टिकल्या पाहिजेत. सध्या भाऊंना जनतेसाठी अहोरात्र काम करताना, संस्था चालवताना किती त्रास होतो, त्याग करावा लागतो, वेदना होतात हे मी जवळून पाहत आहे... असे भाषणात नमूद करीत असताना अचानकपणे नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील हे भावनाविश झाले...त्यांना अश्रू अनावर झाले... त्यामुळे राजवर्धन पाटील यांना काही वेळ भाषण थांबवावे लागले... यावेळी भावनाविश वातावरणामुळे संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते. 
        शहाजीनगर (ता. इंदापूर) येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सोमवारी (दि.23) संपन्न झाली. या सर्वसाधारण सभेमध्ये राजवर्धन पाटील यांनी तालुक्याच्या विकासाचे हित डोळ्यासमोर ठेवून केलेले अतिशय विचारी व अभ्यासपूर्ण भाषण सर्वांच्या कायम स्मरणात राहील असेच झाले. कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये बोलत असताना राजवर्धन पाटील भावनाविश झाले... डोळ्यातून अश्रू वाहू लागले.. त्यानंतर राजवर्धन पाटील यांना भाषण थांबवून पाणी घेतल्यानंतरच पुढील भाषण सुरू करता आले...
        ते म्हणाले.... खरं सांगतोय.. तुमच्यासाठी संस्थांसाठी कष्ट, सर्व त्रास भाऊ सहन करीत आहेत... हे सगळं तुमच्यासाठी चालले आहे. मोठे भाऊ, हर्षवर्धनभाऊ, घोलप साहेबांचे विचार पुढे घेऊन आपण जात आहोत. टीका करणे सोपे असते, त्याग करावा लागतो, वेदना होतात. तरी आम्ही खचून गेलेलो नाही.. खचून जाणार नाही.. सभासद, कर्मचारी, हितचिंतक यांना माहिती आहे की, आंम्ही चुकीचे वागलो नाही.. वागणार नाही...असा विश्वास राजवर्धन पाटील यांनी भाषणात दिला.
      राजवर्धन पाटील पुढे म्हणाले, भाऊंच्या पाठीशी प्रामाणिकपणे उभे रहा, विचारांना महत्त्व आहे, इंदापूर तालुक्यामध्ये भाऊंचे नेतृत्वाखाली राजकारण, समाजकारण करीत असलेले बावड्याचे पाटील घराणे तुमच्यासाठी टिकले पाहिजे, असे भावनिक आवाहनही राजवर्धन पाटील यांनी भाषणात केले. युवा पिढीचे नेतृत्व करीत असलेल्या राजवर्धन पाटील यांच्या करारी परंतु तेवढ्याच प्रेमळ स्वभावाची अनुभूती आजच्या भाषणाने उपस्थित हजारो सभासद, शेतकरी, कामगार, हितचिंतक यांना आली. तसेच राजवर्धन पाटील यांच्या विकासाच्या दूरदृष्टीची व वैचारिक विचारसरणीची जाणीव आज अनेकांना झाली.
_____________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...