मुख्य सामग्रीवर वगळा

"युवकांनी विकसित भारताचे ब्रँड अंबेसिडर व्हावे : ना. रक्षाताई खडसे( राज्यमंत्री,क्रीडा ,युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार)

इंदापूर, डॉ. संदेश शहा. राज्यातील तरुणांनी माय पोर्टल व्दारे विकसित भारत या अभियानात सामील होणे गरजेचे आहे. युवा पिढीने विकसित भारताचे स्वप्न साकारण्या करता पुढे येवून विकसित भारताचे ब्रँड अँबेसेडर व्हावे,असे आवाहन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री नामदार रक्षाताई खडसे यांनी केले.
पुणे खडकी मधील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात विकसित भारत अँम्बेसेडर युवा कनेक्ट उपक्रमातंर्गत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी महाविद्यालय आवारात एक झाड आईच्या नावे ( एक पेड मां के नाम ) या केंद्रशासन प्रणित उपक्रमातंर्गत रक्षा खडसे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील युवा यु ट्युबरर्सशी सुसंवाद साधला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी रक्षा खडसे यांनी उपस्थित युवा पिढीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या भारत सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. विशेषत: त्यांनी 'माय भारत पोर्टल' विषयी माहिती देऊन यात सर्वांनी नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. विकसित भारताचा आराखडा शिक्षण, आरोग्य, कौशल्य, क्रिडा आणि संस्कृती या पाच स्तरांवर आधारित असल्याचे रक्षा खडसे यांनी यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी राष्ट्रीय नेमबाज पटु आश्विनी पाटील हिचा सत्कार रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आला.
 प्रारंभी ना. खडसे यांचा यथोचित सत्कार संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते झाला. 
यावेळी संस्थेचे सचिव आनंद छाजेड, सर्व संस्था पदाधिकारी, सहायक आयुक्त सूरज महाजन,शासकीय अधिकारी, संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी वृंद मोठया संख्येने उपस्थित होते. प्राचार्य डॉ संजय चाकणे यांनी सर उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. नीलेश काळे यांनी आयोजन केले. डॉ. शीतल रणधीर व प्रा. राजेंद्र लेले यांनी सूत्रसंचालन केले. सचिव आनंद छाजेड यांनी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...