मुख्य सामग्रीवर वगळा

*केंद्र सरकारकडून बी हेवी व ज्यूस पासून इथेनॉल उत्पादनावरील बंदी मागे राष्ट्रीय साखर संघाच्या पाठपुराव्यास यश - हर्षवर्धन पाटील*

इंदापूर : 
                केंद्र सरकारने बी हेवी व ज्यूस (ऊसाचा रस ) पासूनच्या इथेनॉल उत्पादनावरती दि.15 डिसेंबर 23 रोजी घातलेला बंदी आदेश गुरुवार दि. 29 ऑगस्ट 24 पासून मागे घेतला आहे. सदरचा बंदी आदेश उठविणे संदर्भात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या पाठपुराव्यास यश आले आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि.29) दिली.
           ते पुढे म्हणाले, देशामध्ये वापरासाठी साखरेची कमतरता भासू नये म्हणून केंद्र सरकारने 15 डिसेंबर 23 रोजी बी हेवी व उसापासून इथेनॉल निर्मितीवरती निर्बंध लागू केले होते. परिणामी, देशातील साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीसाठी केलेली 50 हजार कोटीची गुंतवणूक अडचणीत आली होती. त्यामुळे सदरची बंदी उठविणे संदर्भात गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने भेट घेऊन मागणी केली होती.
          या संदर्भात केंद्र सरकारकडे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघामार्फत सततचा पाठपुरावा सुरु होता. अखेर मागणीस यश येऊन केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालय, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग (साखर आणि वनस्पती तेल संचालनालय) कृषी भवन यांनी बंदी उठविण्याचा आदेश गुरुवार,दि. 29 ऑगस्ट 24 रोजी जारी केला आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
      केंद्र सरकारने बी हेवी व ज्यूस पासून इथेनॉल उत्पादनास घातलेल्या बंदीचा निर्णय मागे घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले. केंद्र सरकारने बंदी आदेश मागे घेतल्याने आगामी सन 2024/25 च्या ऊस गळीत हंगामामध्ये बी हेवी मॉलिसिस व ऊसाच्या रसापासून साखर कारखाने व डिस्टीलऱी प्रकल्पामधून इथेनॉलची निर्मिती होणार आहे. त्यामुळे उत्पादित साखरेपेक्षा उत्पादित इथेनॉलला चांगला दर मिळणार आहे. या निर्णयाचा देशातील पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...