मुख्य सामग्रीवर वगळा

*जेबीव्हीपीतील विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेतील यश कायम*

     जुदो हा लोकांना शारीरिक मानसिक व नैतिकदृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी तयार केलेली कला नसून मार्शल आर्टमधील एक प्रकार असून हा खेळ ताकदीच्या जोरावर अवलंबून असतो हीच स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचानालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धा शहा सांस्कृतिक भवन इंदापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील विविध शाळेतील खेळाडूंनी सहभाग नोंदवून सहभागी झाले होते.यामध्ये विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी मधील 14 वर्ष, 17 वर्ष व 19 वयोगटातील मुले व मुली यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावली.
         *14 वर्ष वयोगट मुली* 
1.ज्ञानेश्वरी येथे 36 किलो (द्वितीय क्रमांक) 
2.पलक काळे ३२ किलो (तृतीय क्रमांक )
 *17 वर्ष वयोगट मुली* 
1.काजल प्रसाद 36 किलो (तृतीय क्रमांक)
2. सोनिया माने, ७० किलो(प्रथम क्रमांक) 
3.सानिका नितीन माने 48 किलो (तृतीय क्रमांक) 
         *17 वर्ष वयोगट मुले* 
 1.मयूर गायकवाड ९० किलोप्रथम क्रमांक
         *19 वर्ष वयोगट मुली* 
1.श्रेया मुडके 63 किलो (प्रथम क्रमांक)
2.प्रिया वाघमोडे 70 किलो( द्वितीय क्रमांक )
3.क्षितिजा शिंदे 44 किलो (तृतीय क्रमांक)
         वरील प्रथम क्रमांक चार खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून ;त्यांनी केलेल्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले, संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले ,संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे, संस्थेचे मुख्य सल्लागार प्रदीप गुरव, विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य सम्राट खेडकर सर व तसेच यांना मार्गदर्शन करणारे शिवराज तलवारे अविनाश कोकाटे ,स्नेहल धायगुडे ,अश्विनी शिंदे ,प्रियांका गोलांडे यांचे मार्गदर्शन लाभले. यांचेही संस्थेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...