मुख्य सामग्रीवर वगळा

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील विद्यार्थिनींनी अनेक क्षेत्रातील व्यक्तींना राखी बांधून जपली सामाजिक बांधिलकी*

  इंदापूर:- जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी मधील विद्यार्थ्यांनींनी आज दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा केला. 
रुग्णसेवेचे अखंड वृत्त हाती घेतलेल्या बावडा गावातील आयुष्यमान आरोग्य मंदिर बावडा. येथील डॉक्टर्स, परिचारिका, अधिकारी वर्ग ज्यांनी काळ, वेळ न पाहता रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानली अशा डॉक्टरांच्या रूपातील देवालाच राखी बांधून आपले सलोखा व स्नेहाचे बंध जपले.
तसेच 'खाकी हीच राखी'मानून संरक्षण करणारे,आपले कर्तव्य निभावणारे पोलीस यांचाही आनंद उत्साहित करण्यासाठी,ऊन, वारा पाऊस, नैसर्गिक संकटांना सामना करत जे आपल्या तालुक्याचे रक्षण करतात अशा आपल्या इंदापूर तालुक्यातील इंदापूर पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांच्यातील आपुलकी व जिव्हाळा जागृत करण्याचे काम प्रशालेतील विद्यार्थ्यांनीनी केले.
याशिवाय ज्यांना ऐकायला व बोलायला येत नाही मूक बधिर म्हणून ज्यांची गणना होते, स्वतःच्या व्यंगामुळे आत्मविश्वास गमावून बसलेली मुले, कुचेष्टेच्या भीतीने सामान्य जनापासून चार हात दूर राहणे पसंत करतात अशा मुलांच्या पंखात बळ देण्यासाठी त्यांना आपुलकी व मायेचा आधार देऊन, राखी बांधून व तोंड गोड करून
 मूकबधिर मुलांचा आनंद द्विगुणीत केला.
रानात दिवसभर राबतो , जो अन्नदाता आहे,जगाचा पोशिंदा आहे अशा शेतकऱ्याला, शेतात शेतीची मशागत करताना, प्रत्यक्ष बांधावर जाऊन विद्यार्थ्यांनी राखी बांधून त्यांच्या कष्टाचे मोल जाणले. 
ज्या समाजात आपण राहतो त्या समाजातील प्रत्येक घटकाच्या आपण काही ना काही ऋणात्मक राहत असतो, डॉक्टरांशी स्नेहबंध, पोलिसांना पवित्र नात्याचे बंधन, स्नेह, आपुलकी, शेतकऱ्यांना हातात बळ, मूकबधिरांच्या पंखात ऊर्जा देण्याचे काम आपण करावे तरच आपली समाजाशी असलेली नाळ कायम जपली जाईल अशा विचाराचा वारसा देणारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माननीय श्री. श्रीमंत ढोले व उपाध्यक्षा सौ. चित्रलेखा ढोले यांनी हा अनोखा उपक्रम राबवण्याची प्रेरणा दिली.
भारतीय संस्कृतीला विविध सण-समारंभाचे देणे लाभलेले आहे, संस्कृतीचे जतन करायचे असेल तर विविध सण- समारंभ उत्साहाने साजरे करावेत, देशसेवेचे व देशहितासाठी कार्य करणाऱ्यासाठी नेहमी कृतज्ञ असावे असा मोलाचा सल्ला देणारे,जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे मुख्य सल्लागार 
श्री.प्रदीप गुरव साहेब यांच्या संकल्पनेतून हा स्तुत्य उपक्रम राबवण्याचा मोलाचा सल्ला मिळाला.
यासाठी प्रशालेतील विद्यार्थिनींनी उस्फुर्त सहभाग घेतला होता, सदर कार्यक्रम राबवण्यासाठी विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री.गणेश पवार प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री. राजेंद्र सरगर, शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते