मुख्य सामग्रीवर वगळा

*केंद्र सरकारकडून बी हेवी व ज्यूस पासून इथेनॉल उत्पादनावरील बंदी मागे राष्ट्रीय साखर संघाच्या पाठपुराव्यास यश - हर्षवर्धन पाटील*

इंदापूर : 
                केंद्र सरकारने बी हेवी व ज्यूस (ऊसाचा रस ) पासूनच्या इथेनॉल उत्पादनावरती दि.15 डिसेंबर 23 रोजी घातलेला बंदी आदेश गुरुवार दि. 29 ऑगस्ट 24 पासून मागे घेतला आहे. सदरचा बंदी आदेश उठविणे संदर्भात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या पाठपुराव्यास यश आले आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि.29) दिली.
           ते पुढे म्हणाले, देशामध्ये वापरासाठी साखरेची कमतरता भासू नये म्हणून केंद्र सरकारने 15 डिसेंबर 23 रोजी बी हेवी व उसापासून इथेनॉल निर्मितीवरती निर्बंध लागू केले होते. परिणामी, देशातील साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीसाठी केलेली 50 हजार कोटीची गुंतवणूक अडचणीत आली होती. त्यामुळे सदरची बंदी उठविणे संदर्भात गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने भेट घेऊन मागणी केली होती.
          या संदर्भात केंद्र सरकारकडे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघामार्फत सततचा पाठपुरावा सुरु होता. अखेर मागणीस यश येऊन केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालय, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग (साखर आणि वनस्पती तेल संचालनालय) कृषी भवन यांनी बंदी उठविण्याचा आदेश गुरुवार,दि. 29 ऑगस्ट 24 रोजी जारी केला आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
      केंद्र सरकारने बी हेवी व ज्यूस पासून इथेनॉल उत्पादनास घातलेल्या बंदीचा निर्णय मागे घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले. केंद्र सरकारने बंदी आदेश मागे घेतल्याने आगामी सन 2024/25 च्या ऊस गळीत हंगामामध्ये बी हेवी मॉलिसिस व ऊसाच्या रसापासून साखर कारखाने व डिस्टीलऱी प्रकल्पामधून इथेनॉलची निर्मिती होणार आहे. त्यामुळे उत्पादित साखरेपेक्षा उत्पादित इथेनॉलला चांगला दर मिळणार आहे. या निर्णयाचा देशातील पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते