मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूरात थंडी वाढू लागली की अशोक भाऊ देवकर यांच्या मसाला दूधाची मजा काही वेगळीच आहे.आठवण झाल्याशिवाय राहत नाही 


इंदापूर :-थंडी वाढू लागली की रात्रीच्या वेळी असे मसाला दूध पिण्याची मजा काही वेगळीच आहे.थंडी पडू लागली की वेगवेगळे सूप, गरमागरम सार, मस्त अद्रक- सुंठ घातलेली कढी... असे सगळे पदार्थ गरमागरम प्यावेसे वाटतात. असाच एक थंडीत पिण्यासाठीची मस्त पदार्थ आहे बरं... तो पदार्थ म्हणजे सुकामेवा आणि केशर घातलेले वाफाळते दुध तेही देवकर बंधू चे इंदापूरात  थंडी वाढू लागली की रात्रीच्या वेळी असे मसाला दूध पिण्याची मजा काही वेगळीच आहे. म्हणूनच तर इंदापूर, शहरांमध्ये थंडीच्या दिवसांत अगदी हाकेच्या अंतरावर गरमागरम मसाला दूध बनविणारे देवकर कुठूबींय....यांनी ग्राहकांची गरज ओळखून एक मसाला दूधाचा मस्तच पाॅईंट चालू केला, मसाला दूध पूर्वी कोजागिरी पौर्णिमेला मिळत असे, पण अशोक देवकर यांनी इंदापूर करांसाठी मसाला दूध चालू करून रोजच कोजागिरी साजरी केल्याचा अनुभव मिळू लागला आहे, युवकांनी नोकरीच्या मागे न लागता असे उद्योग धंदे करून आपले घर प्रपंचा सुरळीत चालवावे कामगार होण्यापेक्षा काम देणारे व्हा असा संदेश इंदापूर तालुक्यातच नव्हे संपूर्ण पुणे जिल्ह्यात नवयुवक यांना अशोक देवकर यांच्या माध्यमातून दिला आहे.मोठ्या. शहरात काही ठेल्यांभोवती केले जाणारे डेकोरेशनही खूपच भारी असते. छान चार खांब टाकून छोटासा मंडप उभा केला जातो. वेगवेगळ्या झिरमिळ्या लावून तो मंडप सजवला जातो. मंडपात मग मध्यभागी मोठी शेगडी आणि त्यावर भल्या मोठ्या काळ्या कढईत उकळत असणारे मसालेदार दूध.  असं झकास वाफाळणारं दूध आता इंदापूरात देवकर दुध यांनी चालूकरून,म्हणजेच थंडी स्पेशल मसाला दुध, मसाला दूध बनविण्यासाठी दूध उकळून, दूध थोडे आटवले तर ते अधिक छान लागते. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार दूध जेवढे पाहिजे तेवढे आटवून खाव्याचा अनुभव 

इंदापूरकरांना मिळतआहे. मसाला दूध पिण्यासाठी इंदापूर शहरातूनच नव्हे तर तालुक्यातील काही गावातून आबालवृद्ध मसाला दुध देवकर यांचे सध्या त्यांच्यासाठी फेमस होत आहे लाखो रुपयांची दुसर्‍याची फ्रांचाईस घेण्यापेक्षा स्वतःचा ब्रँड स्वतः निर्माण केला पाहिजे असे मत अशोक भाऊ देवकर यांनी लक्ष्मी वैभव न्यूज व शिवसृष्टी न्यूज ला बोलताना दिली लाखो रुपये खर्चून जनकी पंखी, उधळपट्टी न करताही उत्तम दर्जा दिला तर आपला व्यवसाय छान व जेमतेम रित्या चालू शकतो असेही अशोक भाऊ देवकर म्हणाले,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...