मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर:
    शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे ऊस लागवड हंगाम सन 2021-22 करीताचे ऊस लागवडीचे धोरण माजी सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी जाहीर केले. 
                      या लागवड धोरणानुसार ऊस उत्पादन तंञाचा अवलंब करून शेतक-यांनी जास्तीत जास्त क्षेञावरती लागवड करून ऊसाचे प्रति एकरी सुमारे 100 टनाहून अधिकचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले. 
         नीरा भीमा कारखान्याचे ऊस लागवडीचे धोरण पुढीलप्रमाणे-
1) आडसाली- 
 लागवड कालावधी - 15 जून ते 31 ऑगस्ट, दिवस 77, (लागवडीचे क्षेत्र 15 टक्के)- फुले 0265
दि. 1 जुलै. ते 31 ऑगस्ट., दिवस 61 (लागवडीचे क्षेत्र 15 टक्के)- को.86032 व  व्ही.एस.आय.8005
2) पूर्व हंगाम - ( लागवडीचा कालावधी -1सप्टें. ते 30 नोव्हें., दिवस 91 (लागवडीचे क्षेत्र 30 टक्के) -कोसी 671, को.86032, व्ही.एस.आय.8005, एम.एस.10001, व्ही.एस.आय.434
3) सुरु - ( लागवडीचा कालावधी -1डिसें. ते 30 एप्रिल, दिवस 151 (लागवडीचे क्षेत्र 15 टक्के) -कोसी 671, को.86032, व्ही.एस.आय.8005, एम.एस.10001, व्ही.एस.आय.434
4) खोडवा- (कारखाना सुरू झालेपासून ते बंद होईपर्यंत (लागवड क्षेत्र 40 टक्के)- वरील सर्व जाती.
        शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड पूर्ण होताच  त्या क्षेत्राची नोंद त्याच दिवशी शेतकी विभागाकडे देणे बंधनकारक आहे. तसेच जेवढ्या क्षेत्राची लागण पुर्ण झाली आहे, तेवढ्यात क्षेत्राची लागण तारीख ग्राह्य धरली जाईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
              ऊस उत्पादक शेतक-यांनी योग्य बेणे निवड, बेणे प्रक्रिया, लागवड पध्दती,रोप लागण पध्दत, रासायनिक खतांच्या माञा, ठिबक मधून द्यायवयाची खते, किड व रोगांचे नियंत्रण या प्रमाणे ऊस उत्पादनाचे तंञ वापरल्यास प्रति एकरी 100 टन किंवा अधिकचे ऊसाचे उत्पादन घेता येईल. ऊस तोडणीचा कार्यक्रमात ऊस लागवड तारखेच्या व सॅम्पल अहवालानुसार कोसी 671, व्ही.एस.आय.434 व एम.एस.10001 या लवकर पक्व होणा-या व जादा साखर उतारा असणा-या ऊस जातींची प्राधान्याने तोडणी करण्यात येईल. त्यानंतर को.86032 या ऊस जातीची तोडणी करण्यात येईल व त्यानंतर फुले 265 या ऊस जातीची तोडणी ही लागण तारखेच्या व सॅम्पल अहवालानुसार केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
                    निरा भिमा कारखाना ऊस विकास योजना प्रभावीपणे राबवित आहे. त्यामध्ये ठिबक सिंचन योजना, बेणे पुरवठा, माती परीक्षण यांचा ऊस उत्पादक शेतक-यांनी लाभ घ्यावा.तसेच कारखान्याकडील उत्पादित सेंद्रिय खतांचा वापर हा ऊस उत्पादक शेतक-यांनी करावा, असे आवाहनही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी केले.
           याप्रसंगी विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, हरिदास घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगिता पोळ, जबीन जमादार या संचालकांसह कार्यकारी संचालक डी.एन. मरकड उपस्थित होते.
                                 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते