मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

  इंदापूर: बारामती स्पोर्ट फाउंडेशन कडून पॅडल फाॅर हिस्ट्री या मोहिमेअंतर्गत एकच ध्यास ३५० किल्ले सायकल प्रवास हे अनोखे अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत महाराष्ट्रातील ऐतिहासीक किल्ल्यांना सायकल वरुन भेटी देण्यात येणार आहेत.आज दि.14 फेब्रुवारी रोजी या अभियानांतर्गत बारामती ते परांडा सायकल रॅली चे आयोजन करण्यात 
करण्यात येत असून इंदापूरमध्ये ही रॅली दाखल होताच माजी मंत्री व भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी या रॅलीचे जंगी स्वागत करून  सरस्वतीनगर बाजूकडील बारामती उड्डाणपूल ते सरडेवाडी येथील हॉटेल स्वामीराज इथेपर्यंत असा पाच किलो मीटरचा सायकल प्रवास करून युवकांना पर्यावरण, शारीरिक तंदुरुस्ती आणि ऐतिहासिक किल्ल्यासाठीच्या  मोहिमेस पाठिंबा दिला. 
यावेळी आय काॅलेजचे विद्यार्थी, प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच इंदापूर सायकल क्बलचे सदस्य सहभागी झाले होते.बारामती स्पोर्ट फाउंडेशन चे प्रमुख आयर्नमॅन सतिश ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
    हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' ऐतिहासीक वारसा लाभलेल्या गड किल्ल्यांची माहिती युवा पिढीला होण्यासाठी हा उपक्रम स्तुस्त आहे. युवकांसाठी ही मोहीम प्रेरक ठरेल. ग्रामीण भागातील युवकांना खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल. पर्यावरणीय जनजागृतीसाठी तसेच कोरोना पार्श्वभूमीवर शारीरिक तंदुरुस्तीसाठी हे उपक्रम प्रेरक आहेत.
   आयर्नमॅन सतिश ननवरे म्हणाले की,' ग्रामीण भागातील मधील युवक आँलंपिकमध्ये  सहभागी होऊन ते यशस्वी व्हावेत यासाठी बारामती स्पोर्ट फाउंडेशनकडून पॅडल फाॅर हिस्ट्री या मोहिमेअंतर्गत अशा उपक्रमाचे आयोजन केले आहे
   सरडेवाडी येथील हाॅटेल स्वामिराज एक्झक्युटीव्हचे मालक बाळासाहेब पाटील यांनी या सायकल रॅलीतील सहभागी व्यक्तींना चहा व अल्पोपहाराची मोफत सोय करून त्यांना पुढील वाटचालीस व सुखकर प्रवासास शुभेच्छा दिल्या.
   यावेळी इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे,इंदापूरचे नगरसेवक प्रशांत शिताफ,हर्षल पाटील आदी उपस्थितीत होते.
     प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...