मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर:प्रतिनिधी दि.19/10/20
       दर हेक्‍टरी च्या संदर्भात सरकारला एवढीच आठवण करून देतो की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः मागच्या पावसाळ्यात जी मागणी केली होती ती मागणी त्यांनी आता पूर्ण करावी. त्या वेळेस ते स्वतः आमच्यासोबत होते.आम्ही दहा हजार  कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते. उद्धव ठाकरे यांनी सांगितले की हे पॅकेज अपूर्ण आहे आणि सरकारने शेतकऱ्यांना स्वतः 25 ते 50 हजार रुपये दर हेक्टरी मदतीची मागणी केली त्यांनी केली होती. आमची मागणी काय असेल ते असेल पण जी मागणी त्यांनी स्वतः केली होती. ते आता मुख्यमंत्री आहेत त्यांनी ती पाठीमागील मागणी आता पूर्ण करावी,अशी मागणी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते ना.देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि.19) येथे केली.
         ना.देवेंद्र फडणवीस हे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पुणे जिल्हाच्या दौऱ्यावरती आज होते. भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत भिगवण, भादलवाडी, सणसर, निमगाव केतकी भागातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी त्यांनी केली.त्यानंतर  इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री बंगलो येथे  पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील मागणी केली.
    यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खा. रणजीत निंबाळकर,आ. रणजित मोहिते पाटील,आ.राहुल कुल,आ.राम सातपुते, माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे आदी उपस्थित होते.
    हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीने शेती, घराचे, दुकानाचे ऐतिहासिक तलावाचे नुकसान झाले असून त्यामुळे अनेक लोकांचे संसार उघड्यावर पडले असून मोठी हानी झाली आहे. या सामान्य नागरिकांना शासनाकडून तात्काळ मदत मिळावी, यासाठी  देवेंद्र फडवणीस यांच्याकडे निवेदन दिले.
            फडणवीस पुढे म्हणाले, शेतकऱ्यांची जी घरे उद्ध्वस्त झाली आहेत त्यांना आम्ही जो कोल्हापूर पॅटर्न दिला होता त्याप्रमाणे मदत झाली पाहिजे.ज्यामध्ये आम्ही जवळजवळ अडीच ते तीन लाखाची मदत केली होती. त्या पॅटर्नप्रमाणे ही मदत त्यांना मिळाली पाहिजे.पण मदत ही तत्काळ केली पाहिजे. दीड महिन्याने मदत करू, देऊ दोन महिन्यात मदत देऊ असे केले नाही पाहिजे. शेतकऱ्याला आता जे काय नुकसान झाले आहे त्याच्यामध्ये तात्काळ त्याला शेती मशागत करण्यासाठी पुढील रब्बी पिके घेता यावे यासाठी तात्काळ मदत मिळाली पाहिजे. अशी मदत मिळाली नाही तर शेतकरी पुढेदेखील उभा राहू शकणार नाही.शेतकरी आपल्या जवळचे सर्व पैसे शेतीसाठी लावत असतो. पीक आल्यानंतर त्याच्याकडे पैसे परत येतात मात्र आता पिकच  वाहून गेले असेल किंवा झोपले असेल, जमीन अनेक ठिकाणी खरडून गेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्याला तात्काळ मदत केली नाही तर तो उभा राहू शकणार नाही. 
    शंभर टक्के हे सरकार टोलवा टोलवी करत आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून सांगितले आहे कि जी मदत पाहिजे ती आम्ही करू.पंतप्रधान स्वतः फोन करून सांगत आहेत मात्र येथे ज्यांची प्राथमिक जबाबदारी आहे.प्राथमिक जबाबदारी राज्याची आहे ते मात्र हात झटकून राहिले आहेत.ते इकडे तिकडे हात दाखवत राहिले आहेत. पहिले आपण काय करणार हे राज्यकर्ते यांनी सांगावे. केंद्र सरकार मदत देईलच,असे देवेंद्र फडवणीस यांनी स्पष्ट केले.
               या पाहणी दौर्‍यामध्ये अनेक शेतकरी, कुटुंबातील महिला कर्त्या पुरुष सदस्यांनी झालेल्या नुकसानीच्या व्यथा विधिमंडळाच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्या पुढे मांडल्या. अनेकांना यावेळी गहिवरून आले होते. अश्रुंचे बांध फुटले होते. तत्काळ मदतीची भावना सर्वांनी व्यक्त केली.
      यावेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार, शहराध्यक्ष शकील सय्यद, तानाजी थोरात, मारुतीराव वनवे, पराग जाधव  उपस्थित होते.
_______________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...