मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर:प्रतिनिधी दि.19/10/20
       दर हेक्‍टरी च्या संदर्भात सरकारला एवढीच आठवण करून देतो की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः मागच्या पावसाळ्यात जी मागणी केली होती ती मागणी त्यांनी आता पूर्ण करावी. त्या वेळेस ते स्वतः आमच्यासोबत होते.आम्ही दहा हजार  कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते. उद्धव ठाकरे यांनी सांगितले की हे पॅकेज अपूर्ण आहे आणि सरकारने शेतकऱ्यांना स्वतः 25 ते 50 हजार रुपये दर हेक्टरी मदतीची मागणी केली त्यांनी केली होती. आमची मागणी काय असेल ते असेल पण जी मागणी त्यांनी स्वतः केली होती. ते आता मुख्यमंत्री आहेत त्यांनी ती पाठीमागील मागणी आता पूर्ण करावी,अशी मागणी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते ना.देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि.19) येथे केली.
         ना.देवेंद्र फडणवीस हे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पुणे जिल्हाच्या दौऱ्यावरती आज होते. भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत भिगवण, भादलवाडी, सणसर, निमगाव केतकी भागातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी त्यांनी केली.त्यानंतर  इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री बंगलो येथे  पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील मागणी केली.
    यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खा. रणजीत निंबाळकर,आ. रणजित मोहिते पाटील,आ.राहुल कुल,आ.राम सातपुते, माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे आदी उपस्थित होते.
    हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीने शेती, घराचे, दुकानाचे ऐतिहासिक तलावाचे नुकसान झाले असून त्यामुळे अनेक लोकांचे संसार उघड्यावर पडले असून मोठी हानी झाली आहे. या सामान्य नागरिकांना शासनाकडून तात्काळ मदत मिळावी, यासाठी  देवेंद्र फडवणीस यांच्याकडे निवेदन दिले.
            फडणवीस पुढे म्हणाले, शेतकऱ्यांची जी घरे उद्ध्वस्त झाली आहेत त्यांना आम्ही जो कोल्हापूर पॅटर्न दिला होता त्याप्रमाणे मदत झाली पाहिजे.ज्यामध्ये आम्ही जवळजवळ अडीच ते तीन लाखाची मदत केली होती. त्या पॅटर्नप्रमाणे ही मदत त्यांना मिळाली पाहिजे.पण मदत ही तत्काळ केली पाहिजे. दीड महिन्याने मदत करू, देऊ दोन महिन्यात मदत देऊ असे केले नाही पाहिजे. शेतकऱ्याला आता जे काय नुकसान झाले आहे त्याच्यामध्ये तात्काळ त्याला शेती मशागत करण्यासाठी पुढील रब्बी पिके घेता यावे यासाठी तात्काळ मदत मिळाली पाहिजे. अशी मदत मिळाली नाही तर शेतकरी पुढेदेखील उभा राहू शकणार नाही.शेतकरी आपल्या जवळचे सर्व पैसे शेतीसाठी लावत असतो. पीक आल्यानंतर त्याच्याकडे पैसे परत येतात मात्र आता पिकच  वाहून गेले असेल किंवा झोपले असेल, जमीन अनेक ठिकाणी खरडून गेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्याला तात्काळ मदत केली नाही तर तो उभा राहू शकणार नाही. 
    शंभर टक्के हे सरकार टोलवा टोलवी करत आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून सांगितले आहे कि जी मदत पाहिजे ती आम्ही करू.पंतप्रधान स्वतः फोन करून सांगत आहेत मात्र येथे ज्यांची प्राथमिक जबाबदारी आहे.प्राथमिक जबाबदारी राज्याची आहे ते मात्र हात झटकून राहिले आहेत.ते इकडे तिकडे हात दाखवत राहिले आहेत. पहिले आपण काय करणार हे राज्यकर्ते यांनी सांगावे. केंद्र सरकार मदत देईलच,असे देवेंद्र फडवणीस यांनी स्पष्ट केले.
               या पाहणी दौर्‍यामध्ये अनेक शेतकरी, कुटुंबातील महिला कर्त्या पुरुष सदस्यांनी झालेल्या नुकसानीच्या व्यथा विधिमंडळाच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्या पुढे मांडल्या. अनेकांना यावेळी गहिवरून आले होते. अश्रुंचे बांध फुटले होते. तत्काळ मदतीची भावना सर्वांनी व्यक्त केली.
      यावेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार, शहराध्यक्ष शकील सय्यद, तानाजी थोरात, मारुतीराव वनवे, पराग जाधव  उपस्थित होते.
_______________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...