मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

फोटो:- इंदापूर येथे दूधगंगा दूध संघाच्या संघाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील.
 इंदापुर:दुधगंगा दूध उत्पादक सहकारी संघ चालु राहू नये म्हणून राज्याचे दुग्धव्यवसाय विकास खात्याचे राज्यमंत्री असलेले इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे  जाणून-बुजून मंत्रीपदाचा वापर करून दबाव आणून अडथळे आणत आहेत.मात्र शासनाने दिलेल्या अवसायानाच्या अंतरिम आदेशाला उच्च न्यायालयाने दि.23 जून रोजी पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांच्या मालकीच्या असलेल्या दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघा विरोधात तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी घेतलेली भूमिका निंदनीय व शेतकरी विरोधी तसेच सहकार चळवळीच्या विरोधात आहे, अशी जोरदार टीका राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि.24) इंदापूर येथे केली.
             इंदापूर येथील दुधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाने जगप्रसिद्ध अमूल बरोबर करार केला असून संकलन दि.8 जून पासून सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर दूधगंगा दूध संघाच्या कार्यालयामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन पाटील त्यांनी तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनी दुध  संघाच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेवर जोरदार  टिकास्त्र सोडले.
                 हर्षवर्धन पाटील म्हणाले, दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघ सुरू होऊ नये तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत. शासनाचे धोरण हे सहकार चळवळ वाढीचे असते, मात्र तालुक्याचे राज्यमंत्री शासनाच्या धोरणाविरोधात सहकारी संघ अडचणीत आणण्याचे काम करीत आहेत. त्यांच्याकडील दुग्ध व्यवसाय विकास खात्याने संघाला दि.16 रोजी गडबडीत रात्री 11.05 मिनिटांनी गैरलागू कारणे नमूद करून व  सहकारातील नियमांची प्रक्रिया बाजूला ठेऊन  दिलेल्या अवसायानाच्या अंतरीम नोटिशीला आम्ही कायदेशीर असे उत्तर दिले आहे.सदरची शासनाची नोटीस चुकीचे असल्याने न्यायालयाने  स्थगिती आदेश दिला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.तसेच दूध संघाकडून दि. 20 जून पर्यंतच्या दुधाचे पैसे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाले आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
            दुध संघाने अमूलशी करार केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे.मात्र   मंत्रिपदावर असलेले लोकप्रतिनिधी राजकीय हेतूने शेतकरी हिताच्या विरोधी भूमिका घेत संघास विरोध करीत आहेत.मात्र शासनाचे कामकाज हे नियमानुसार चालते, एखाद्या व्यक्तीच्या आकसापोटी चालत नाही,असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्टपणे नमूद केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना अमूल च्या मार्फत मिळणाऱ्या विविध सुविधांची माहिती दिली.
                 या पत्रकार परिषदेला इंदापूर बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, दूध संघाचे अध्यक्ष मंगेश पाटील, उपाध्यक्ष उत्तम जाधव, उदयसिंह पाटील, लालासाहेब पवार, कृष्णाजी यादव, भरत शहा, विलास वाघमोडे, देवराज जाधव, कांतीलाल झगडे, महेद्र रेडके,संजय देहाडे, दीपक जाधव, नानासाहेब शेंडे,पराग जाधव, पिंटू काळे, निलेश देवकर, दत्तात्रय शिर्के, वसंत मोहोळकर, आबासाहेब शिंगाडे, कैलास कदम, सुभाष काळे, रघुनाथ राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
--------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते