भक्तांच्या वाटेत खड्डे अन् प्रशासनाच्या खिशात टोल;संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील इंदापूर-अकलुज रस्तेकामाचा बोजवारा..!
इंदापूर: संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे 'राष्ट्रीय महामार्ग' म्हणून मोठ्या थाटामाटात नामकरण झाले खरे, मात्र जमिनीवरची परिस्थिती अत्यंत विदारक आहे. इंदापूर ते अकलुज दरम्यानच्या रस्त्याचे काम अद्यापही रेंगाळलेले असताना, दुसरीकडे वाहनधारकांकडून मात्र सक्तीने टोल वसुली सुरू असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. काम अर्ध्यावर, टोल जोमात इंदापूर-अकलुज भागात अनेक ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण अपूर्ण आहे. रस्ता ठिकठिकाणी उखडलेला असून वाहन चालवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे, रस्ता पूर्ण झालेला नसतानाही टोल नाका मात्र पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला आहे. " रस्ता नाही तर टोल कशाचा? " असा सवाल आता स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून विचारला जात आहे. बावडा बायपास 'बंद'च! या मार्गावरील बावडा येथील बायपासचे काम रखडल्याने हा भाग वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला झालेला नाही. बायपास बंद असल्याने वाहतुकीचा सर्व ताण मुख्य गावातून किंवा अरुंद रस्त्यांवरून येत आहे. परिणामी, दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोक...