मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लोकनेते प्रदीप (दादा) गारटकर मित्र परिवारातर्फे इफ्तार पार्टीचे उत्साहात आयोजन सलग ३६ वर्षांची सामाजिक सलोख्याची परंपरा कायम

इंदापूर:- जनसामान्यांचे नेते श्री. प्रदीप (दादा) गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली, 'प्रदीप (दादा) गारटकर मित्र परिवारा'च्या वतीने यावर्षीही पवित्र रमजान महिन्यानिमित्त भव्य 'रोजा इफ्तार' पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या ३६ वर्षांपासून सालाबादप्रमाणे ही परंपरा अविरतपणे सुरू असून, या कार्यक्रमातून सर्वधर्मसमभावाचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.मुस्लिम समाजाला रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन 13/3/2026. शुक्रवार रोजी करण्यात आले इफ्तार पार्टी आयोजनाचे यावर्षी 36 वे वर्ष होते यावेळी मोठ्या प्रमाणावर इंदापूर शहर तथा तालुक्यातील मुस्लिम समाज उपस्थित होता इंदापूर शहरातील सर्व 14 मशिदीचे 18 मौलाना सहाब यांचा मा. प्रदीप (दादा) गारटकर यांच्या हस्ते येतोचित असा सन्मान (गुलपोशी) करण्यात आला   राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असतानाही, गारटकर मित्र परिवाराने गेल्या साडेतीन दशकांपासून ही धार्मिक एकात्मतेची परंपरा जोपासली स्थानिक भागातील मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि रोजेदार मोठ्या संख्येने या इफ्तार पार्टीला उपस्थित ह...

इंदापूर तालुक्यातील हिंदू-मुस्लीम ऐक्य राज्यात आदर्श- हर्षवर्धन पाटील-बावडा येथे इफ्तार पार्टी

इंदापूर : प्रतिनिधी दि.16/3/26                                       इंदापूर तालुक्यामध्ये पिढ्यान पिढ्यांपासून हिंदू-मुस्लीम समाज हा बंधुभावाने राहत असून, एकमेकांच्या सुख दुखात नेहमीच सहभागी राहिलेला आहे. इंदापूर तालुक्यातील हिंदू-मुस्लीम एकोपा राज्यामध्ये आदर्श असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.15) केले.           बावडा येथे जामा मस्जिदमध्ये हर्षवर्धन पाटील यांचे उपस्थितीमध्ये ईफ्तार पार्टीचे  आयोजन करण्यात आले होते. यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते.        ते पुढे म्हणाले, स्वतःच्या गावातील इफ्तार पार्टीला उपस्थित राहण्यास वेगळाच आनंद असतो. आपण कायमच सर्वधर्मसमभावाच्या मूल्यांची जोपासना करीत राजकारण, समाजकारण केले आहे, करीत आहोत. जगातील कोणताही धर्म असो तो माणुसकीची शिकवण देतो, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.  बावडा ग...

युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने साखर कारखान्यांचा इथेनॉल कोटा वाढवावा- हर्षवर्धन पाटील-साखर निर्यातीसाठीही मदतीची गरज

                                                 इंदापूर:- सध्या आखाती देशात चालु असलेल्या युद्धामुळे क्रूड ऑइलच्या दरात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम नैसर्गिक वायू मंत्रालयाने जाहीर केलेल्या दि. 1 एप्रिलपासूनच्या नवीन धोरणानुसार पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणासाठी साखर कारखान्यांना इथेनॉलचा कोटा तातडीने वाढवून द्यावा, परिणामी, इथेनॉल मिश्रणामुळे पेट्रोल दरवाढीसंदर्भात जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळु शकेल. तसेच साखरेच्या निर्याती संदर्भातही केंद्र सरकारकडून मदतीची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी केले.        राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचेकडे देशातील साखर कारखान्यासंदर्भात विविध मागण्या करून तातडीने निर्णय घ्यावेत, अशी विनंती केली आहे, असे हर्षवर्धन पाटील य...

वाल्हेत संजय जगताप मित्र परिवारातर्फे इप्तार पार्टी

वाल्हे प्रतिनिधी : सिकंदर नदाफ रमजान महिन्याचे औचित्य साधून माजी आमदार संजय चंदुकाका जगताप मित्र परिवारातर्फे वाल्हे ( ता.पुरंदर ) येथील शाही सुन्नी मशिदीत सालाबादप्रमाणे रोजा इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुस्लीम बांधवांसह महिला वर्गाने देखील रोजा इप्तार पार्टीत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शविल्याने मस्जिद परिसर अक्षरशः गजबजून गेला होता.  यावेळी संजय जगताप मित्र परिवारातर्फे मुस्लीम समाजातील उपवास धारकांना रोजा इप्तारीसाठी सरबत मिठाईसह फळांचे वाटप करण्यात आले.त्यानंतर मगरीबची नमाज अदा झाल्यावर रोजा इप्तार पार्टी उत्साही वातावरणात साजरी करण्यात आल्याने मुस्लीम समाजातआनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच जातीय सलोखा अबाधित रहावा तसेच मित्रत्वाची भावना देखील वाढली पाहिजे या उद्देशाने माजी आमदार संजय जगताप मित्र परिवाराकडून पुरंदर हवेलीतील जवळपास सर्व मशिदीत इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष मोबीन बागवान यांनी दिली. या प्रसंगी मुस्लिम समाजाचे चांदभाई इनामदार आरिफ आतार आयुब इनामदार अरबाज नदाफ शौकत शेख आयान ...

भारतीय क्रिकेट संघाचा विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद नगराध्यक्ष मा.भरतशेठ शहा,

 इंदापूर :- टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाचा  पराभव करून विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे नगराध्यक्ष मा.भरतशेठ शहा, यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. इंदापूर तालुक्यातील सर्वच गावातील जनतेत आनंदोत्सव साजरा करण्यात आला,विविध भागात अबालवृध्द चौकाचौकात मोठ्या स्क्रिनवर मॅच पाहण्याचा आनंद घेत होते, हि मॅच पाहतानाचा आनंद गगनात मावत नव्हता,आपण जिंकणारच आसे सगळेच बोलत होते,खेळाडूंनी त्यांची इच्छा पुर्ण केली,सलाम त्यांच्या कार्याला,आसे नगराध्यक्ष मा.भरतशेठ शहा ,म्हणाले की, आपल्या संदेशात म्हणाले की, भारतीय संघाने संपूर्ण टी-२० विश्वचषक स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, संघभावना आणि समर्पित खेळभावना ही संपूर्ण देशातील क्रीडाप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे.या ऐतिहासिक विजयामुळे देशभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भारतीय संघाने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले असून भारताचा तिरंगा जगभर अभिमानाने फडकावला आहे.शिवसृष्टी न्यूज शी बोलताना नगराध्यक्ष मा.भर...

वाल्हेत उदयगिरी फाउंडेशनतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

वाल्हे प्रतिनिधी: सिकंदर नदाफ  सामाजिक चळवळीचे केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावात उदयगिरी सोशल फाउंडेशन व नाना दाते मित्र परिवारातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला . यावेळी वाल्हे ग्रामपंचायत नजीक शाहू फुले आंबेडकर अभ्यासिकेच्या सभागृहासमोर वृक्षारोपण करूनच या सन्मान सोहळ्याला सुरवात करण्यात आली.या कार्यक्रमात जेजुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक दिपाली पवार यांसह लेखिका राधिका घोरपडे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या डॉ. प्राजक्ता दुर्गाडे विधितज्ञ प्रिया दरेकर माय मराठी संघाच्या कल्पना शेरे माजी उपसरपंच सम्राज्ञी लंबाते तसेच दिपाली नलावडे धनश्री कसेकर गीता नांगरे आदी महिलांना विविध मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र तसेच पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी वाल्हे गावचे सरपंच अतुल गायकवाड उपसरपंच सागर भुजबळ सामाजिक कार्यकर्ते नाना दाते उदयगिरी फाउंडेशनचे शिवशंकर मोरे सचिन म्हसे तसेच सतीश पवार असलम नदाफ दिगंबर दाते आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र...

इंदापूर येथील हर्ष शिंदे सनदी लेखपाल परीक्षा उत्तीर्ण

इंदापूर : प्रतिनिधी दि.3/3/26                              इंदापूर येथील हर्ष प्रतीक शिंदे हे सनदी लेखपाल (सी. ए.) परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. हर्ष शिंदे यांनी राष्ट्रीय स्तरावरील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ची सी. ए. फायनल परीक्षा उत्तीर्ण होऊन हे प्रतिष्ठेचे यश संपादन केले आहे.     हर्ष शिंदे यांचे पूर्व प्राथमिकचे शिक्षण इंदापूर येथील गारटकर इंग्लिश मिडीयम स्कूल येथे तर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विद्या प्रतिष्ठानचे इंग्लिश मिडीयम स्कूल इंदापूर येथे झाले. तर उच्च माध्यमिक व वाणिज्य पदवीचे शिक्षण पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळाच्या महाविद्यालय व कॉलेजमध्ये झाले. हर्ष शिंदे हे एल.आय.सी.चे इंदापूर येथील सेवानिवृत्त विकास अधिकारी प्रतिक सुधाकर शिंदे यांचे चिरंजीव आहेत. दरम्यान, इंदापूरचे सुपुत्र हर्ष शिंदे हे सीए झालेबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.