मुख्य सामग्रीवर वगळा

नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी - प्रविण माने

इंदापूर:-रविवार दिनांक २५ मे रोजी इंदापूर तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने सर्वत्र प्रचंड नुकसान झाल्याची परिस्थिती आहे. मे महिन्याच्या अखेरीस आपल्या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस कधी होत नसल्याने, अवकाळी ओढवलेल्या या परिस्थितीने शेतकरी बांधवांचे व नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ढगफुटीसदृश पावसाने, नीरा नदीच्या पाणी पातळीतदेखील अचानक वाढ होऊन, नदीच्या काठावरील गावांतून पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे एकीकडे ढगफुटीसारखा पाऊस व त्यावर नीरा नदीच्या पुराने नागरिकांची चांगलीच दैना झाल्याची परिस्थिती पहावयास मिळत आहे.

इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे,भिगवण,मदनवाडी, भिगवण स्टेशन, सणसर, जांब, कुरवली, चिखली, उद्धट, लाकडी, निंबोडी आदी गावांसह नीरा नदी काठची गावे हि विशेष बाधित झाल्याची परिस्थिती आहे. या परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने येथील कुटुंबांनचे मोठे नुकसान झाले आहे.

नागरीवस्तीप्रमाणे दुसरा सर्वांत जास्त बाधित घटक म्हणजे शेती असून, कालच्या ढगफुटीसदृश अवकाळी पावसाने डाळिंब, द्राक्षे, पेरू, केळी या फळबागांचे तसेच मका, कांदा, भुईमुग, चारा पिकांसह शेतातील इतर सर्व पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पाण्याचा लोंढा प्रचंड असल्याने शेतीतील माती वाहून गेली असून, काही प्रमाणात पशुधनाचेही नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले.

इंदापूर विभाग हा तसा कमी पावसाचा प्रदेश परंतु कालच्या ढगफुटीसदृश पावसाने छोट्या छोट्या ओढ्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याची परिस्थिती झाली होती. यातून शिकवण घेऊन तालुक्यातील नागरिकांना आगामी पावसाळ्यात सावधतेने राहणे अतिशय गरजेचे होणार आहे. तसेच तालुक्यात अद्याप काही ठिकाणी रस्त्यांची अवस्था अतिशय गंभीर असून येत्या पावसाळ्यात हि परिस्थिती अतिशय हालाकीची होण्याची परिस्थिती आहे, यामुळे पावसाने उघडीप दिल्यावर या रस्त्यांची कामेही गुणावत्तापूर्वक पद्धतीने व्हायला हवी.

या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रविण माने यांनी अवकाळी पाऊसाने बाधित गावांना भेट देत पाहणी केली. शेती पिके, फळबागा, घरे, व मालमत्ता यांचे कृषी, महसूल, ग्रामविकास खात्याने तातडीने पंचनामे पूर्ण करून, कुठल्याही शेतकरी बांधवावर अन्याय होणार नाही या पद्धतीने काम करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना माने यांनी दिल्या. याचसह कालच्या पावसाने रस्ते व पुल यांचेही अतोनात नुकसान झाले आहे, त्याचीही तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी यावेळी प्रशासनाकडे करण्यात आली असून, शासनाच्या माध्यमातून नागरिकांना तातडीने मदत मिळण्याकरता आपण स्वतः जातीने लक्ष घालणार असल्याचा शब्द माने यांनी नागरिकांना दिला.

या पाहणी दौऱ्यात कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती मयूरसिंह पाटील, शेटफळगढे गावचे सरपंच शंकर राऊत, अमोल साळुंखे, अमोल झगडे, संदीप मचाले,माऊली भोसले, रोहित कदम, अनिल घोरपडे, अशोक जगताप, शिवाजी मचाले, अविनाश मचाले, दिपक वाबळे, सतीश मचाले,अमोल मचाले,आदित्य हिडगे,अमोल मचाले, किरण खोचरे, पंढरीनाथ कदम,पंडित जोशी,तलाठी गर्जे भाऊसाहेब, ग्रामसेवक अशोक कदम आदी उपस्थित होते.


प्रतिक्रिया - इंदापूर तालुक्यातील बहुतांश गावांवर ओढवलेली परिस्थिती हि अतिशय भयंकर असून, नदी किनाऱ्यावरील स्थलांतरीत नागरिकांसह, शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळवून देवून त्यांचे अश्रू प्रशासनाने तातडीने पुसावेत हीच माझी प्रमुख मागणी असून, यासाठी मी जातीने पाठपुरावा करणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते