मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

     इंदापुर :केंद्र सरकारकडून साखर उद्योगाला मदती संदर्भात आठवडाभरात निर्णय होणार आहेत.सध्या अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला मदत करण्याची केंद्र सरकारची भूमिका आहे, अशी माहिती भाजपचे नेते व राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज (दि.28) दिली.
           नवी दिल्ली येथे गुरूवार (दि.27)  केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना महाराष्ट्रातील साखर उद्योगाचे शिष्टमंडळ भेटले. यावेळी केंद्रीय मंत्री महोदयांसमवेत झालेल्या बैठकीत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र सरकारकडून साखर उद्योगाच्या मदती संदर्भात विविध मागण्या करून, सविस्तरपणे चर्चा केली व आपली भूमिका मांडली.तसेच  मदती संदर्भातील धोरणात्मक निर्णय लवकर घेतले जावेत, अशी विनंती केल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
                     गेली दोन-तीन वर्षातील दुष्काळी परिस्थितीमुळे आणि उस दर व साखरेची विक्री किमत यामधील तफावतीमुळे साखर कारखाने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांकडील कर्जाचे वन टाइम पुनर्गठन करावे, साखरेचा बफर स्टॉक वाढवून द्यावा, कारखान्यांना साखर निर्यातीचे अनुदान द्यावे, सॉफ्ट लोन उपलब्ध करून द्यावे तसेच  सुमारे 20 हजार कोटी रुपयांचे अनुदानाचे बेल आऊट पॅकेज द्यावे आदी मागण्या या बैठकीमध्ये केंद्र सरकारकडे करण्यात आल्या. सदरच्या मागण्यांवर केंद्र सरकार सकारात्मक असून निर्णय घेणेसाठी पुढील आठवड्यामध्ये बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती मंत्रीमहोदयांनी बैठकीत शिष्टमंडळाला दिली, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.केंद्रीय  मंत्री गटाचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे साखर उद्योगाला मदत करण्याच्या मानसिकतेत आहेत, त्यामुळे पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत केंद्र सरकारकडून साखर उद्योगासाठी चांगले निर्णय जाहीर होतील,अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
              सदरच्या शिष्टमंडळांमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील तसेच आ.राहुल कुल, आ.रणजितसिंह मोहिते पाटील, धनंजय महाडीक, पृथ्वीराज  देशमुख, कल्याणराव काळे यांचा समावेश होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते