मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी इंदापूर सज्ज.आरोग्य विभाग चोख बंदोबस्त करणार

पालखी मार्गावरील विहिरीची पाहणी करताना वैद्यकीय पथक इंदापूर, आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर इंदापूरातील प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडीच्या वतीने वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आमदार दत्तात्रय भरणे मामा यांनी आढावा बैठकीत दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करण्यात येत असल्याची माहिती केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत श्रेणिक शहा यांनी दिली.  पुणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी संतोष पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. अभय तिडके यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी सचिन खुडे, डॉ. सुरेखा पोळ, संतोष बाबर यांच्या नियंत्रणाखाली पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, आरोग्य सेवा, योग्य औषधोपचार मिळावे यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. पालखी मार्गावर भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता मार्गावरील विविध ग्रामपंचायत, हॉटेल्स, खाजगी ...

वाल्हे येथील दारूच्या अड्यावर पोलीसांचा छापा

वाल्हे प्रतिनिधी : सिकंदर नदाफ वाल्हे ( ता.पुरंदर ) येथील माळवाडी जवळ गावठी दारूसाठी प्रसिद्ध असलेल्या महादेव नगरमधील दारूच्या अड्यावर पोलीसांनी अचानकपणे छापा टाकला.या कारवाईमध्ये एका दारू विक्रेत्या महिलेला पोलीसांनी रंगेहाथ पकडले असून तिच्या विरोधात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.  यावेळी वाल्हे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वाल्हे हद्दीतील माळवाडी नजीकच्या रेल्वे रुळाजवळील पत्रा शेडच्या आडोशाला गावठी दारूची विक्री केली जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती .त्यानुसार या ठिकाणची पाहणी केली असता एका महिलेला प्लास्टिकच्या पिशवीतून गावठी (हातभट्टी) दारूची विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आले. या बाबतची फिर्याद पोलीस नाईक प्रशांत रामदास पवार यांनी दिली आहे.त्यानुसार राणीबाई तानाजी राठोड ( वय ५० ) हिच्या विरोधात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .तर या प्रकरणाचा अधिक तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रविराज कोकरे हे करीत आहेत.

नितीन गडकरी यांची हर्षवर्धन पाटील यांनी घेतली पालखी मार्ग व बॅकवॉटर पुला संदर्भात भेट •नितीन गडकरींकडून संबंधित विभागांना कार्यवाहीच्या सूचना

 रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत रविवारी भेट घेतली. इंदापूर                 केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत रविवारी (दि. 23) भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग, उजनी पाणलोट क्षेत्रा (बॅक वॉटर) तील पूल व इतर विकास कामांसंदर्भात नितीन गडकरी यांचेकडे हर्षवर्धन पाटील यांनी विविध मागण्या सादर केल्या.                   संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे इंदापूर तालुक्यामध्ये अवघ्या 10-15 दिवसांमध्ये आगमन होत आहे. तरीही या पालखी महामार्गाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे वारकऱ्यांचा प्रवास हा अपूर्ण कामांमुळे अडचणीचा होणार असे दिसत आहे. त्यामुळे वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देणेसाठी पालखी महामार्गाचे काम युद्धपातळीवरती करणे, तसेच पर्यायी व्यवस्था करणेसंदर्भात यावेळी चर्...

भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते आमदारकी ची निवडणुक लढवणारच

इंदापूर - मागील 20 वर्षापासून राजकारण, समाजकारणात सक्रिय आहे. चिंचवडचे आ. लक्ष्मण जगताप (चिंचवड) यांच्या निधानानंतर झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळीच निवडणूक लढविण्यासाठी मी तीव्र इच्छुक होतो. परंतु, पक्षश्रेष्टींच्या सूचनेनुसार माघार घेतली. आता निवडणूक लढविणारच, असा निर्धार भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी केला. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने इच्छुकांनी तयारी सुरु केली आहे. चिंचवडमधून निवडणूक लढविण्यासाठी नखाते यांनी मागील सहा महिन्यांपासून तयारी सुरु केली आहे. नखाते यांनी सांगितला. नखाते म्हणाले, चिंचवड विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून चिंचवडचा कायापालट केला आहे. मतदार भाजपच्या पाठिशी ठामपणे उभा आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना चिंचवडमधून 74 हजार 765 चे मताधिक्य मिळाले आहे. मी तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आलो आहे. क्रीडा समितीचा पहिला सभापती होतो. पत्नीही एकवेळा नगरसेविका होती. गेल्या 20 वर्षांपासून आम्ही समाजकारणात आहोत. नगरसेवक अ...

कृषी सिंचनासाठीची पाणीपट्टी वाढ मागे घ्यावी - हर्षवर्धन पाटील- जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

इंदापूर :                       महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधीकरणाने (एमडब्ल्यूआरआरए) दि.29 मार्च 2022 रोजी आदेश जारी करून कृषी सिंचनासाठी पाणीपट्टीमध्ये वाढ केली आहे. सदरची पाणीपट्टीमध्ये केलेली वाढ राज्य शासनाने मागे घ्यावी, अशा मागणीचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत शनिवारी दि. 21 दिले.               जलसंपदा विभागाकडून महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव तयार कारण्यात आला होता. त्या प्रस्तावास महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मार्च 2022 मध्ये मान्यता दिली. मात्र सदरची करण्यात आलेली मोठी दरवाढ शेतकरी वर्गावर अन्यायकारक अशी आहे. सध्या अडचणीत असलेल्या शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने पाणीपट्टीमध्ये केलेली दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी सदर पत्रात हर्षवर्धन पाटील यांनी केल...

*मा.शरदचंद्र पवार यांच्या हस्ते पुरस्कारांचे उद्या (दि. २२) बालगंधर्व रंगमंदिर येथे वितरण*

 इंदापूर:- यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतीच चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणाऱ्या यशस्विनी सन्मान पुरस्कारांची घोषणा केली. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते अध्यक्षतेखाली त्यांच्या हस्ते या पुरस्कारांचे उद्या (दि. २२) बालगंधर्व रंगमंदिर येथे वितरण करण्यात येणार असून पद्मश्री अनु आगा या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रात लागू केलेल्या महिला धोरणांची तीन दशके या आढावात्मक पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात येणार आहे.  निमंत्रक : खासदार सुप्रिया सुळे,स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर,वेळ : सकाळी १०.०० वाजता,वार :  शनिवार,दि. : २२ जून २०२४

जिजाऊ इन्स्टिट्युट येथे वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी

इंदापूर:- विश्व प्रतिष्ठान संचलित जिजाऊ इन्स्टिट्यूट कालठण च्या अध्यक्षा प्रा.जयश्री गटकुळ यांनी  वटपौर्णिमानिमित वृक्षारोपण करून "*माझ्या मैत्रिणींनो वडाच्या फांद्या तोडू नका, वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून निसर्गाचा समतोल बिघडवू नका,चार झाडे लावून वटपौर्णिमा साजरी केल्याचा आनंद निश्चितच समाधानकारक आहे.  वटपौर्णिमा निमित्त वृक्षारोपण करा*"असे आवाहन प्रा.जयश्री गटकुळ यांनी केले. या कार्यक्रमासाठी जिजाऊ इन्स्टिट्युटचे प्राचार्या राजश्री जगताप,रेखा जगताप, सारिका चोरमले, प्रतीक्षा कोळेकर, सोनाली महाडिक - जाधव अन्य मान्यवर उपस्थित होते हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतातनिसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्...