मुख्य सामग्रीवर वगळा

श्री.संत जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील इंदापूर येथे वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी

इंदापूर

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील इंदापूर येथे वारकऱ्यांची केली मोफत आरोग्य तपासणी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी चालत असलेल्या वारकऱ्यांकरिता महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय नामदार श्री चंद्रकांतदादा पाटील व श्री राजेशजी पांडे समर्थ युवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून तसेच श्री सचिनआबा पवार यांच्या समर्थ सोशल फाउंडेशन यांच्या आयोजनातुन इंदापूर येथे सुमारे 370 वारकऱ्यांची निशुल्क आरोग्य तपासणी आज करण्यात आली. यामध्ये रक्तातील शुगर, बी पी, तपासून रिपोर्ट देण्यात आले. तसेच दातांची तपासणी व दात साफ करून गरज असेल तर सिमेंट भरून देण्यात आले तसेच डोळ्यांची मोतीबिंदू, काचबिंदू तपासणी करून नंबरचे चस्मे देण्यात आले. अशा विविध तपासण्या करण्यात आल्या यावेळी या आरोग्य शिबिराचे उदघाटन देहू संस्थाचे अध्यक्ष जगतगुरू श्री तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज ह भ प श्री पुरषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला वसईविरारचे उपजिल्हा अधिकारी  शेखर घाडगे, पुणे शहर भाजप उपाध्यक्ष सुनील पांडे,इंदापूर वारकरी संप्रदायीचे खुशाल कोकाटे,डॉ संजय शिंदे, प्रा शरद झोळ,कृषि अधिकारी सुधीर आवचर,सावता माळी संस्थानचे सुधीर माळी सर, माढा कृषी विभागचे  शरद पवार,गिरीश भिसे, गोरख शिंदे,सचिन महाजन, प्रसाद गारटकर इ मान्यवर उपस्थित होते तसेच या शिबीराला पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रवीणभैय्या माने, तसेच समर्थ युवा फाउंडेशनच्या सौ सरोज पांडे यांनी यावेळी शिबीराला भेट दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते

नीरा-भीमा कारखान्यावरती संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व कारखान्याची स्थापनेपासूनची सलग 5 वी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध -सर्व 21 जागा बिनविरोध

इंदापूर :प्रतिनिधी दि.13/3/2025                         शहाजीनगर(ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-26 ते 2030-31 या कालावधीच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सलग 5 व्या पंचवार्षिक निवडणुकीत कायम राहिले आहे. या कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या 25 वर्षात सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (दि.13) सर्व 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.           माजी मंत्री हर्षवर्धन पाटील त्यांनी सन 1999 मध्ये नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. त्यानंतर संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व निवडणुका बिनविरोध होत आहेत.          नीरा-भीमा कारखान्याने स्थापनेपासून चांगले कामकाज करीत गेल्या 25 वर्षांमध्ये शेतकर्‍यांचा विश्वास संपादन केलेला आहे . तसेच सध्...