मुख्य सामग्रीवर वगळा

*इंदापूरच्या आश्रमशाळेत पालखी सोहळा उत्साहात*

*इंदापूर : पंढरीच्या वारीची परंपरा ही आपली वारकरी संस्कृती आहे. यातून सामाजिक ऐक्य, सर्व धर्म समभाव ही विचारधारा विद्यार्थ्यांमध्ये रुजावी या उद्देशाने मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे आणि मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात शालेय पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 
या वेळी शालेय वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. यात विद्यार्थी विविध संतांच्या,वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले.विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई आदी संतांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या. या वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले होते.विठ्ठल–विठ्ठल, ज्ञानोबा- माऊलीच्या गजरात विद्यार्थ्यांनी पालखीचा आनंद अनुभवला. 
शिक्षक हिरालाल चंदनशिवे, नानासाहेब सानप यांनी वारी, दिंडीच्या परंपरेचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे(काकी),सचिव ॲड. समीर मखरे यांनी पालखीचे पारंपरिक पूजन केले.
 विद्यार्थ्यांनी हाती भगव्या पताका फडकवित,टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा - माऊली तुकाराम असा नामघोष आणि पांडुरंगाचे नामस्मरण करीत प्रांगणात पालखी सोहळा पार पडताच,इंदापूर प्रमाणेच रिंगण करण्यात आले. विद्यार्थी व शिक्षकांनी फुगड्या खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. विद्यार्थ्यांच्या हातात भगवे झेंडे / पताका ,तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन बघून हे जणू पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता. मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे यांच्या नियोजन आणि संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांची दिंडी आषाढी एकादशी निमित्त उत्साहात संपन्न झाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते

नीरा-भीमा कारखान्यावरती संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व कारखान्याची स्थापनेपासूनची सलग 5 वी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध -सर्व 21 जागा बिनविरोध

इंदापूर :प्रतिनिधी दि.13/3/2025                         शहाजीनगर(ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-26 ते 2030-31 या कालावधीच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सलग 5 व्या पंचवार्षिक निवडणुकीत कायम राहिले आहे. या कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या 25 वर्षात सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (दि.13) सर्व 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.           माजी मंत्री हर्षवर्धन पाटील त्यांनी सन 1999 मध्ये नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. त्यानंतर संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व निवडणुका बिनविरोध होत आहेत.          नीरा-भीमा कारखान्याने स्थापनेपासून चांगले कामकाज करीत गेल्या 25 वर्षांमध्ये शेतकर्‍यांचा विश्वास संपादन केलेला आहे . तसेच सध्...