मुख्य सामग्रीवर वगळा

वाल्हेत शरदचंद्र पवार गटाकडून वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन

वाल्हे प्रतिनिधी-सिकंदर नदाफ महर्षी वाल्मीकी ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाल्हे नगरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून पायी वारी करणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची अप्रतिम व्यवस्था करण्यात आल्याने वाल्हेकर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडी तर्फे वाल्हे नजीक सुकलवाडी फाट्यावर भव्य महाप्रसाद छत्राची उभारणी करण्यात आली होती. यामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना महाप्रसाद म्हणून चपाती भाजी फोडणीचा भात व बदामाचा शिरा पोटभर देण्यात आला. त्यामुळे वारकरी संप्रदायात देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
या दरम्यान राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडीचे राज्य प्रमुख ह.भ. प. विठ्ठल( आबा) मोरे म्हणाले माऊलींचा पालखी सोहळा महाराष्ट्रातून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी भक्तियोग असतो.त्यामुळे पंढरीच्या वाटेवर पाऊल टाकणाऱ्या वारकऱ्यांना सकस ताजे पौष्टीक भोजन देण्यासाठी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वच पदाधिकारी मनोभावे प्रयत्न करत आहोत.
या प्रसंगी अवधूत खाडे राम कोळपकर सुरेश पंडित श्रीकांत महामुनी देविका मोरे सुकलवाडीचे जेष्ठ नेते शिवाजीराव पवार यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते