मुख्य सामग्रीवर वगळा

*नाविन्यपूर्ण उपक्रमाने जयभवानी गड विकास प्रतिष्ठानने केली आगळीवेगळी होळी*


 इंदापूर  :- जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 13 मार्च 2025 रोजी होळी सण साजरा करण्यात आला.
  होळी सणाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये एका अनोख्या, नाविन्यपूर्ण उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते, आज समाजामध्ये लहानापासून ते अबालवृद्धापर्यंत मोबाईल वापरला जातो, मोबाईल सर्वांचीच अत्यंत गरजेची वस्तू बनली आहे समाजामध्ये असे चित्र दिसत आहे की सर्वच जण मोबाईलच्या आहारी जात आहेत आणि मोबाईल व्यसनाधीन होत आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून जास्तीत जास्त दूर राहावे व आपल्या आरोग्याला घातक असणाऱ्या मोबाईलचे दुष्परिणाम काय आहेत हे समजून घ्यावेत म्हणून आज होली या सणानिमित्त प्रशालेच्या आवारामध्ये होलिका दहन करण्यात आले त्यामध्ये मोबाईल विषयी असणारे विविध ॲप्स कसे घातक आहेत हे विद्यार्थ्यांना समजून सांगण्यात आले . तसेच सर्व विद्यार्थ्यांनी शपथ घेतली की, 
*होळीच्या या पावन पर्वाच्या निमित्ताने मी शपथ घेतो की*, *होळीमध्ये माझ्या मनातील राग, द्वेष,मत्सर या वाईट गोष्टीचा त्याग करून चांगल्या गोष्टीचा अंगीकार करेन*. *आज पासून मी मोबाईल पासून दूर राहीन. फेसबुक, इंस्टाग्राम वरती रिल्स पाहण्यात जाणारा वेळ मी चांगल्या कामासाठी वापरेन जसे की, अभ्यास करण्यासाठी* *आई-वडिलांना कामात मदत करण्यासाठी या वेळेचा सदुपयोग करीन व मोबाईल फोनचा वापर फक्त आवश्यक असेल तेवढाच करेल आणि माझ्या आई वडिलांचे स्वप्न साकार करेन*.
वाईट आहे ते जाळूया, चांगले आहे ते जपूया. आणि आयुष्याचा रंगमंच आनंदाने रंगवूया, त्याप्रमाणे सर्वांचेच वाईट विचार, दुःख, तणाव जळून जावेत आणि नवीन ऊर्जा सकारात्मकता, आणि समृद्धीचा प्रकाश प्रत्येक विद्यार्थ्यात उतरावा म्हणूनच होलिका दहन प्रशालेच्या आवारात करण्यात आले.
विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री.गणेश पवार , प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री. राजेंद्र सरगर, सर्व विभागाचे सुपरवायझर यांच्या हस्ते होलीकापूजन व होलिका दहन करण्यात आले.

होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा, आळस यांचे दहन होवो व सर्वांना सुख, समृद्धी लाभो अशा मंगलमय शुभेच्छा संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष मा.श्री.श्रीमंत ढोले यांनी दिल्या. तसेच होळी सणानिमित्त पाणी जपून वापरा, केमिकल युक्त रंगापासून लांब रहा असा मोलाचा सल्ला संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. चित्रलेखा ढोले यांनी दिला.
संस्थेचे मुख्य सल्लागार माननीय श्री. प्रदीप गुरव साहेब तसेच सचिव श्री. हर्षवर्धन खाडे यांनीही सर्वांना होळीच्या रंगमय शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमासाठी विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. गणेश पवार प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री.राजेंद्र सरगर, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य सम्राट खेडकर तसेच सर्व विभागाचे सुपरवायझर, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते