मुख्य सामग्रीवर वगळा

*महाराष्ट्राला शिवाजी महाराजांच्या आचार-विचारांची गरज - महारूद्र पाटील*

इंदापूर:-शिवजयंती आली की शिवरायांचा आपण जयघोष करतो मात्र केवळ आणि केवळ शिवजयंती पर्यंतच महाराजांना मर्यादित ठेवायचे आहे का याचा विचार करायला हवा. महाराजांच्या नावाचा जयघोष करणाऱ्यांचा महाराष्ट्रात सुकाळ आहे आणि त्यांच्या विचारांना कृतीत आणणार्‍या लोकांचा मात्र दुष्काळ आहे ही महाराष्ट्राची सध्याची वास्तविकता आहे.आज खरं तर महाराष्ट्राला शिवाजी महाराजांच्या आचार-विचारांची गरज आहे महाराजांनी शिकवलेल्या त्या छोट्या छोट्या मूल्यांची जपणूक करण्याची गरज आहे महाराष्ट्रातील महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे या सर्व व्यतिरिक्त महाराजांच्या आदरांजली देण्याकरिता केवळ आणि केवळ शिवजयंतीच्या चौकटीत न राहता शिवरायांची विचारसरणी आत्मसात करून ती प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणणे आवश्यक आहेआसे मतमराठा साम्राज्याचा इतिहास असो, महाराजांचे कार्य आणि त्यांचे शौर्य सदैव प्रेरणादायी आहे.शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. खरं तर त्यांच्या जन्मतारखेबद्दल बरेच वाद होते यावर महाराष्ट्र सरकारने तोडगा काढत 2001 या वर्षी 19 फेब्रुवारी ही जयंती शिवरायांची जन्मतारीख निश्चित केली आणि तेव्हापासून 19 फेब्रुवारीला शिवजयंती देशभरात उत्साहात साजरी केली जाते.आदिलशाही, निजामशाही आणि मुघल सत्ता किंवा स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला अत्यंत धैर्याने छत्रपती शिवाजी महाराजानी सामना केला आणि ते यशस्वी ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा अजरामर आहे त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य रयतेच्या सुखासाठी स्वराज्याच्या स्वप्नासाठी वाहले. शेवटच्या क्षणापर्यंत ते लढले. अखेर रायगडावर ३ एप्रिल १६८० रोजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. आसे मत मा.श्री.महारूद्र पाटील कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर यांनी व्यक्त केले यावेळी विकास खिलारे ,किसन जावळे, अमोलशेठ भिसे,छगन तांबिले समदभाई सय्यद सह इतर मान्यवर उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...