मुख्य सामग्रीवर वगळा

*इंदापूर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला संपन्न'*

  इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला ,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागाच्या वतीने इंदापूर महाविद्यालयामध्ये बॅ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला संपन्न झाली. 
     राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे व उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांच्या मार्गदर्शनातून ही व्याख्यानमाला संपन्न झाली. 
     या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प पुणे येथील स.प. महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रा. रूपाली अवचरे यांनी गुंफले. 'थोडे हसू आणि थोडे आसू' या विषयावरती त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या ,'आज हृदयविकाराचे वय हे पंधरा वर्षापर्यंत आलेले आहे , म्हणून सर्वांनाच हसण्याची गरज आहे. ताणतणाव मुक्त जीवन जगणे अत्यंत गरजेचे बनलेले आहे. म्हणून थोडे असू आणि थोडे हसू असेच आपले जीवन असले पाहिजे. दुसरे गुंफण्यासाठी पुणे येथीलच श्री. दशरथ यादव हे उपस्थित राहिले .'साहित्यराजे संभाजी महाराज'या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपले मनोगत व्यक्त करताना ते असे म्हणाले,' छत्रपती संभाजी महाराज हे केवळ लढवय्येच नव्हते. तर ते साहित्यिक होते. लेखक होते .कवी होते. संस्कृत भाषेवरती संभाजी महाराजांचे प्रभुत्व होते.म्हणून संभाजी महाराजांनी बुधभूषण यासारखे ग्रंथ संस्कृत मधून लिहिलेले आहेत. एकंदरीत तथागत भगवान गौतम बुद्धापासूनची पुरोगामी परंपरा छत्रपती संभाजी महाराजांनी अंगीकारलेली दिसून येते. छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य आज आपणा सर्वांच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन केले'. या व्याख्यानमालेतील तिसरे पुष्पगुंपण्यासाठी पुणे येथून सिद्धिविनायक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.शैलेश त्रिभुवन उपस्थित राहिले. 'चित्रपटांनी मला घडविले' या विषयावरती विद्यार्थ्यांना आपले मार्गदर्शन केले .आपले व्याख्यानातून ते असं म्हणाले, 'चित्रपटांच्याकडे केवळ मनोरंजनात्मक दृष्टीने न पाहता नोकरीतील सेवेच्या संधी म्हणूनही पाहिले पाहिजे. त्यातून आपले जीवन फुलविले पाहिजे. आज विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता चित्रपटाच्या माध्यमातून वेगळी विचारधारा अंगीकारली पाहिजे. अनेक रोजगाराच्या संधी चित्रपट क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. याच्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणे विद्यार्थ्यांना दिली.
     या व्याख्यानमालेसाठी डॉ. भिमाजी भोर, डॉ. शिवाजी वीर, डॉ. सदाशिव उंबरदंड यांचेही मार्गदर्शन लाभले.
    सदर व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी डॉ. राजाराम गावडे, डॉ. गजानन ढोबळे, डॉ. भरत भुजबळ, डॉ. प्रज्ञा लामतुरे , डॉ.राजकुमार शेलार , प्रा.गौतम यादव, प्रा.मनिषा गायकवाड, प्रा. वैभव लट्टे, मयूर मखरे, अभिमन्यू भंडलकर , शहाजी जाधव ,आहेर तसेच या व्याख्यानमालेचे केंद्र कार्यवाह प्रा. श्रीनिवास शिंदे यांनी प्रयत्न केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते