इंदापूर: -दिल्ली येथे झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लुमेवाडी येथे कार्यरत असलेल्या निमगाव केतकीच्या डॉ. उषा भोईटे पवार यांच्या अनुभुतींचे धागे या ललित साहित्याचे प्रकाशन अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे सदस्य व साहित्यिक राजन लाखे यांच्या हस्ते २२फेब्रुवारी २०२५ रोजी झाला. यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे रविंद्र बेडकिहाळ , अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे सदस्य डॉ. मनोज वराडे, गोमंतक साहित्य मंडळ गोवाचे कोषाध्यक्ष राजमोहन शेट्ये, आणि दिल्ली अखिल भारतीय साहित्य संमेलन काव्यकट्टा समन्वयक गोपाळ कांबळे हे उपस्थित होते. डॉ. उषा भोईटे पवार यांचे पहिलेच पुस्तक राजधानी दिल्लीत प्रकाशित झाले ही इंदापूर साठी अभिमानाची बाब आहे.त्यांचे हे पुस्तक शब्द शिवार प्रकाशनने प्रकाशित केले असून काजवाकार पोपट काळे यांनी प्रस्तावना दिली आहे. आजवर प्रकाशित व अप्रकाशित लेखांचा संग्रह म्हणजे अनुभुतींचे धागे हा ललित संग्रह आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असा काहीसा अनुभव या निमित्ताने आल्याचे डॉ. भोईटे यांनी ...
SHIVSRUSTHI NEWS