मुख्य सामग्रीवर वगळा

*सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी ( सीसीएमपी ) उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांना आधुनिक चिकित्सा पद्धतीची औषधे वापरण्याची परवानगी, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी च्या नेतृत्वात मोठा विजय,*

इंदापूर, डॉ. संदेश शहा.
महाराष्ट्र राज्यातील ज्या नोंदणीकृत होमिओपॅथिक डॉक्टरांनी सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी ( सीसीएमपी ) हा अभ्यासक्रम उत्तीर्ण केला आहे, त्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा महाराष्ट्र वैद्यकिय परिषद अधिनियम १९६५ अन्वये वैद्यक व्यावसायिक म्हणून व्याख्येत समावेश करून त्यांना आधुनिक चिकित्सा पद्धतीची औषधे वापरून वैद्यकिय व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिनांक २६ डिसेंबर २०२४ रोजी प्रशासनातील सर्व विभागीय सह आयुक्त, सहाय्यक आयुक्त व औषध निरीक्षक यांना परिपत्रक जारी केले आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत नियम १९०५ मधील २ ईई नुसार 
सीसीएमपी नोंदणीकृत डॉक्टरांना घाऊक किंवा किरकोळ विक्रेते ऍलोपथिक औषधांची विक्री करू शकतात तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे देखील देण्याचा आदेश परिपत्रक व्दारे देण्यात आला आहे. त्यामुळे 
सीसीएमपी नोंदणीकृत डॉक्टरांच्या लढ्यास यश आले आहे. यासाठी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ. बाहुबली शहा यांनी पाठपुरावा केल्यामुळे हा विजय संपादन करण्यात आला. या निर्णयाचे स्वागत डॉक्टरांनी एकमेकांना पेढे भरवत जल्लोषात केले.
महाराष्ट्र होमिओपॅथी कौन्सिल च्या प्रयत्नाने व मा.ना.अजितदादा पवार यांच्या राजकीय इच्छाशक्ती मुळे सन २०१४ मधे महाराष्ट्र वैद्यक परिषद अधिनियम व महाराष्ट्र समचिकित्सा अधिनियम यात दुरुस्त्या करून राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांना आवश्यक तिथे एलोपथिक औषधोपचार करता यावे या करिता एक वर्ष कालावधीचा सीसीएमपी अभ्यासक्रम चालू करण्यात आला. अभ्यासक्रम चालू होऊन आठ वर्षात काही हजार डॉक्टरांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. परंतु अन्न व औषध अधिनियम मधील कलम २ ईई नुसार या डॉक्टरांना पेशंट साठी औषधे खरेदी करण्यात व लिहून देण्यात कायदेशीर अडचणी येत होत्या. सीसीएमपी कोर्सच्या यशस्वी निर्मिती वेळी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी च्या प्रशासकपदी असलेल्या डॉ. बाहुबली शहा यांची शासनाने पुनश्च ऑक्टोबर २०२४ मधे प्रशासक पदी नियुक्ती केल्यानंतर त्यांनी अजितदादा, तत्कालीन मंत्री धर्मराव अत्राम, तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष व विद्यमान मंत्री मा. नरहरी झिरवाळ साहेब यांच्या सहकार्याने मा. डॉ. रजनीताई इंदुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व कमिटी सदस्य बाळासाहेब पवार, नितीन गावडे व सुधीर म्हात्रे यांच्या सह राज्याचे औषध नियंत्रक मा. गहाने साहेब व उपायुक्त मा. संतोष काळे साहेब यांच्याशी बैठका आयोजित करून त्यांना सर्व कायदेशीर वस्तुस्थिती कागदपत्रां सह त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी ही सर्व वस्तुस्थिती मान्य करून सहकार्य केले. आचारसंहिता समाप्ती व मंत्रिमंडळ स्थापना झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांनी सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांचे हक्क बहाल करणारे परिपत्रक जारी केले. या निर्णयाचे डॉ. बाळासाहेब पवार, 
डॉ. नितीन गावडे यांच्या सह हजारो डॉक्टरांनी स्वागत करून शासन, प्रशासन तसेच महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ. बाहुबली शहा यांना धन्यवाद दिले.
राज्यात ९० हजार होमिओपॅथिक डॉक्टर असून पैकी २४ हजार हून जास्त डॉक्टरांनी उपरोक्त अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. ग्रामीण भागातील होमिओपॅथिक डॉक्टरांवर रुग्णसेवेची मदार आहे. त्यामुळे मागील नागपूर अधिवेशनात सर्व होमिओपॅथिक संघटनांनी एकत्र येत उपोषण केले होते. त्याची दखल तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, नंदकुमार गावित यांनी घेतली होती. त्यानंतर डॉक्टरांच्या मागणीने वेग घेतल्यामुळे सरकारने त्याची दखल घेवून योग्य कार्यवाही करण्यास सुरुवात केली. त्यानंतर निवडणुका होवून भाजप, शिवसेनेचे सरकार सुरू झाले. या कालावधीत सीसीएम पी अभ्यासक्रमाची सुरुवात झाली. हजारो होमिओपॅथिक डॉक्टरांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला.
या निर्णयामुळे ज्या गावात आरोग्य सेवा नाही, त्या गावात आरोग्य सेवेचे सक्षमी करण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळण्यास मदत होणार आहे.
मात्र इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य संघटनेने या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे हा निर्णय औट घटकेचा ठरतोय का हा निर्णय इतर राज्यांना सर्वांना आरोग्य देण्यासाठी मार्गदर्शक ठरतोय याकडे विविध वैद्यकिय शाखांचे तज्ञ, संघटनांचे लक्ष लागले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...