मुख्य सामग्रीवर वगळा

*भारत देशात प्रथम होमिओपॅथी औषधे वापरून आंबा निर्मिती करणारे अरण ( जिल्हा सोलापूर ) येथील शेतकरी दत्तात्रय घाडगे यांचा कृषिरत्न पुरस्कार देवून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार*

इंदापूर, डॉ. संदेश शहा.
आंबा लागवडी मध्ये रासायनिक खतांचा वापर करण्याऐवजी होमिओपॅथिक औषधांचा वापर करून नैसर्गिकरित्या आंब्याचे उत्पादन घेणारे भारता तील पहिले आंबा बागायतदार तसेच दोन व तीन किलोचा आंबा तयार करणारे अरण ( ता. माढा जिल्हा सोलापूर ) येथील प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय घाडगे यांना देशपातळीवरील राष्ट्रीय नागरी व पर्यावरण संरक्षण या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते तसेच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय नेते महेंद्रसिंह टीकैत यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय कृषिरत्न पुरस्कार देवून दिल्ली येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले. 
 राष्ट्रीय नागरी व पर्यावरण संरक्षण या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने दिल्ली येथे नुकतीच जागतिक पर्यावरण परिषद संपन्न झाली. या परिषदेत संस्थेचे अध्यक्ष विजयराज ढमाळ व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत होमिओपॅथिक पद्धतीने आंब्याचे उत्पादन घेणारे देशातील पहिले शेतकरी दत्तात्रय घाडगे यांना एकमेव कृषी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
दत्तात्रय घाडगे यांच्या आंबा बागेत २० हजार
 हजार झाडे.
शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर श्री. घाडगे यांनी‌ अरण येथील माळराना वरती आठ एकरा मध्ये दहा हजार आंब्याची झाडे लावली. त्यांच्याकडे आंब्याच्या एकूण १६ जाती आहेत. त्यांच्याकडे इतर फळ झाडे व पारंपारिक दहा हजार झाडे त्यांच्या बागेत आहेत. शेततळे, विहीर, बोर यांच्या माध्यमातून ठिबक सिंचन द्वारे झाडांना पाणी दिले जाते.गेली आठ वर्षापासून ते
 बागेचे संगोपन करत आहेत. 
होमिओपॅथी खते व फवारा. 
रासायनिक खतांमुळे मानवी शरीराचे तसेच झाडाचेही मोठे नुकसान होते. त्यामुळे घाडगे यांनी दोन वर्षापासून आंब्याच्या बागेला पूर्णपणे होमिओपॅथी विद्राव्य खते ठिबक मधून देण्यास सुरुवात केली तसेच फवाऱ्या द्वारे हीच औषधे ते झाडांवर मारतात. त्यामुळे झाडे ताजी, टवटवीत दिसतात. तसेच आंब्यामध्ये कुठलाही रासायनिक पदार्थ येत नसून आंबे चवीला अतिशय गोड लागतात. रासायनिक खताच्या तुलनेत ३० टक्के फक्त होमिओपॅथी औषधाला खर्च येतो.
रायचूर प्रयोगशाळेचे सर्टिफिकेट. 
कुठल्याही फळांमध्ये किंवा भाज्यांमध्ये रासायनिक खत व फवाऱ्याचा अंश आहे का याची तपासणी करणारी भारतात एकमेव प्रयोगशाळा रायचूर येथे आहे. या प्रयोगशाळेने घाडगे यांच्या बागेतील आंब्याच्या दीडशे चाचण्या घेऊन त्यांच्या आंब्यामध्ये कुठलाही रासायनिक पदार्थ नसल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे बाजारपेठेतील आंब्या पेक्षा घाडगे यांच्या आंब्याचा दर दीडपट असतो. तरी देखील ग्राहक मोठ्या आनंदाने आंबे खरेदी करतात. 
शरद व सावता आंब्याची जगभर चर्चा.
श्री. घाडगे यांनी त्यांच्या बागेमध्ये शरद व सावता या दोन आंब्याच्या जाती शोधून काढून त्याचे पेटेंट देखील घेतले आहे. शरद आंबा हा साधारण तीन किलोचा तर सावता आंबा हा दोन किलोचा आहे. संपूर्ण भारतात एवढ्या वजनाचा आंबा कोठेही मिळत नाही. त्यामुळे देश परदेशातून देखील लोक त्यांच्या बागेतील आंबे पाहण्यासाठी तसेच याची रोपे घेण्यासाठी येत आहेत. याच शोधामुळे घाडगे यांना विविध पुरस्कार मिळत आहेत. 
यासंदर्भात दत्तात्रय घाडगे म्हणाले, होमिओपॅथी हे शास्त्र केवळ मनुष्यांसाठी उपयुक्त नसून अखिल प्राणिमात्र, झाडे यांच्यासाठी देखील उपयुक्त आहे. महाविद्यालय पातळीवर देखील याचा सर्वांगीण अभ्यास तसेच संशोधन होणे गरजेचे आहे. रासायनिक खतांचे दुष्परिणाम आपण अनुभवत आहोत. त्या पार्श्वभूमीवर मानवी आयुर्मान वाढविण्या साठी, नैसर्गिक शेतीसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होमिओपॅथिक संशोधन केंद्र सुरू करणे ही काळाची गरज आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...