मुख्य सामग्रीवर वगळा

उद्योग व्यापारातील सचोटी, नीतिमूल्ये, गुणवत्ता आणि विश्वास जयकुमार पाटील यांनी जपला : डॉ. रावसाहेब पाटील.

इंदापूर, डॉ. संदेश शहा.
उद्योग व्यापारातील सचोटी, नीतिमूल्ये, गुणवत्ता आणि विश्वास जयकुमार पाटील यांनी जपला. सोलापूरच्या औद्योगिक विश्वातील जयकुमार पाटील हे कोहिनूर हिरा होते असे प्रतिपादन पंचरंग प्रबोधिनीचे संपादक डॉ. रावसाहेब पाटील यांनी केले.
यशवंतराव चव्हाण सेंटर मुबई शाखा सोलापूर आणि मंगळवेढेकर इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट या संस्थांच्या वतीने सोलापूरचे उद्योगपती जयकुमार कलगौंडा पाटील यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे औचित्य साधून सोलापूरा तील उद्योग आणि व्यापार या विषयावर डॉ. रावसाहेब पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले.  
डॉ. रावसाहेब पाटील पुढे म्हणाले, यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर आंतरिक प्रेरणा महत्वाची असून त्यासाठी लागणारी दूरदृष्टी अनुभवातून समृद्ध होत असते. सचोटी, गुणवत्ता, विश्वासार्हता,परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वास हे गुण
यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक असतात. बाजारपेठेचा आणि ग्राहकांच्या मानसिकतेचा डोळे आणि कान उघडे ठेवून बदलत्या तंत्रज्ञानाचा अवलंब करत हिशोबी आव्हाने स्वीकारली तर कोणतीही व्यक्ती उद्योगपती होऊ शकते असा विश्वास डॉ. पाटील यांनी व्यक्त केला. जगात फुकट काही मिळत नाही, उद्योग सुरू करा, तुमचे अनुभव, कल्पना, श्रम दुसऱ्या उद्योगपतीला किंवा कंपनीला मोठे करण्यासाठी वापरू नका. स्वतःच्या लहान उद्योगाला मोठे करण्या साठी वेळ, कल्पना आणि खर्च करा. भारत हा जगातील मोठा देश असून भविष्यात उद्योजकांसाठी हा देश पर्वणी ठरणार आहे. लक्ष्मी उद्योग समूहाचे संस्थापक स्व.जयकुमार कलगोंडा पाटील यांनी उद्योग व्यापारातील नीतिमूल्ये जपली, धनाचा मोठेपणाचा हव्यास त्यांनी कधी केला नाही, ग्राहक आणि कामगार वर्गात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यात ते यशश्वी झाले. सोलापूर शहरातील पहिली होटगी रोड येथील एमआयडीसी निर्माण करण्यात त्यांचे वडील कलगौंडा पाटील तर चिचोली एमआयडीसी निर्मितीत जयकुमार पाटलांचे योगदान उल्लेखनीय आहे. सोलापूरचे औद्योगिक वैभव निर्मितीसाठी नव उद्योजकानी जयकुमार पाटील यांच्या जीवन कार्याचा आदर्श घेवून सोलापूरचे औद्योगिक विश्व महाराष्ट्रात समृद्ध करावे असे आवाहन शेवटी डॉ. पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या संचालिका प्रा. सविता वैद्य यांनी तर वक्ते डॉ. पाटील यांचा परिचय प्रा. स्नेहल पाठक यांनी करून दिला. समाजशास्त्राच्या अभ्यासक,लेखक दत्ता गायकवाड यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरची भूमिका स्पष्ट केली तर सरफराज शेख यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी दिनेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मंगळवेढेकर मॅनेजमेंट कॉलेजचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...