मुख्य सामग्रीवर वगळा

उद्योग व्यापारातील सचोटी, नीतिमूल्ये, गुणवत्ता आणि विश्वास जयकुमार पाटील यांनी जपला : डॉ. रावसाहेब पाटील.

इंदापूर, डॉ. संदेश शहा.
उद्योग व्यापारातील सचोटी, नीतिमूल्ये, गुणवत्ता आणि विश्वास जयकुमार पाटील यांनी जपला. सोलापूरच्या औद्योगिक विश्वातील जयकुमार पाटील हे कोहिनूर हिरा होते असे प्रतिपादन पंचरंग प्रबोधिनीचे संपादक डॉ. रावसाहेब पाटील यांनी केले.
यशवंतराव चव्हाण सेंटर मुबई शाखा सोलापूर आणि मंगळवेढेकर इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट या संस्थांच्या वतीने सोलापूरचे उद्योगपती जयकुमार कलगौंडा पाटील यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे औचित्य साधून सोलापूरा तील उद्योग आणि व्यापार या विषयावर डॉ. रावसाहेब पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले.  
डॉ. रावसाहेब पाटील पुढे म्हणाले, यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर आंतरिक प्रेरणा महत्वाची असून त्यासाठी लागणारी दूरदृष्टी अनुभवातून समृद्ध होत असते. सचोटी, गुणवत्ता, विश्वासार्हता,परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वास हे गुण
यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक असतात. बाजारपेठेचा आणि ग्राहकांच्या मानसिकतेचा डोळे आणि कान उघडे ठेवून बदलत्या तंत्रज्ञानाचा अवलंब करत हिशोबी आव्हाने स्वीकारली तर कोणतीही व्यक्ती उद्योगपती होऊ शकते असा विश्वास डॉ. पाटील यांनी व्यक्त केला. जगात फुकट काही मिळत नाही, उद्योग सुरू करा, तुमचे अनुभव, कल्पना, श्रम दुसऱ्या उद्योगपतीला किंवा कंपनीला मोठे करण्यासाठी वापरू नका. स्वतःच्या लहान उद्योगाला मोठे करण्या साठी वेळ, कल्पना आणि खर्च करा. भारत हा जगातील मोठा देश असून भविष्यात उद्योजकांसाठी हा देश पर्वणी ठरणार आहे. लक्ष्मी उद्योग समूहाचे संस्थापक स्व.जयकुमार कलगोंडा पाटील यांनी उद्योग व्यापारातील नीतिमूल्ये जपली, धनाचा मोठेपणाचा हव्यास त्यांनी कधी केला नाही, ग्राहक आणि कामगार वर्गात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यात ते यशश्वी झाले. सोलापूर शहरातील पहिली होटगी रोड येथील एमआयडीसी निर्माण करण्यात त्यांचे वडील कलगौंडा पाटील तर चिचोली एमआयडीसी निर्मितीत जयकुमार पाटलांचे योगदान उल्लेखनीय आहे. सोलापूरचे औद्योगिक वैभव निर्मितीसाठी नव उद्योजकानी जयकुमार पाटील यांच्या जीवन कार्याचा आदर्श घेवून सोलापूरचे औद्योगिक विश्व महाराष्ट्रात समृद्ध करावे असे आवाहन शेवटी डॉ. पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या संचालिका प्रा. सविता वैद्य यांनी तर वक्ते डॉ. पाटील यांचा परिचय प्रा. स्नेहल पाठक यांनी करून दिला. समाजशास्त्राच्या अभ्यासक,लेखक दत्ता गायकवाड यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरची भूमिका स्पष्ट केली तर सरफराज शेख यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी दिनेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मंगळवेढेकर मॅनेजमेंट कॉलेजचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते