मुख्य सामग्रीवर वगळा

राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी व इंदर जैन यांचा सन्मान सोहळा जीतो पुणे परिवाराच्या वतीने संपन्न.

इंदापूर, डॉ. संदेश शहा. जैन समाजाची सर्वांत मोठी संघटना असलेल्या जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जीतो चे राष्ट्रीय अध्यक्षपद पहिल्यांदाच विजय भंडारी यांच्या रुपाने पुण्यास मिळाले आहे. जीतो 
अँडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग फाउंडेशन अर्थात जेएटीएफ चे अध्यक्षपद देखील पहिल्यांदाच इंदर जैन यांच्या रुपाने पुण्याला मिळाल्याने जीतो पुणे परिवार आणि मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. 
विजय भंडारी व इंदर जैन यांचा हा सन्मान सोहळा कोरेगाव पार्क येथील हॉटेल कोनरॅड सभागृहात संपन्न झाला. या सन्मान सोहळ्यास सिद्धीविनायक ग्रुपचे प्रमुख राजेश सांकला, प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ विधीज्ञ एस. के. जैन, जीतो अपेक्स चे माजी अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथा, सकल जैन संघाचे विजयकांत कोठारी, लायन्स क्लबचे द्वारका जालान, जीतो पुणेचे माजी अध्यक्ष अचल जैन, ओमप्रकाश रांका, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, रविराज ग्रुपचे रवींद्र सांकला, लायन्स क्लबचे राज मुच्छाल, जीतो ॲपेक्स च्या संचालक प्रियांका परमार, जीतो पुणेचे अध्यक्ष इंदर छाजेड, जीतो पुणेचे उपाध्यक्ष चेतन भंडारी, सकल जैन संघ पुणेचे विलास राठोड, सिद्धी फाउंडेशनचे प्रमुख मनोज छाजेड, युगल धर्म संघाचे मंगेश कटारिया, दि पूना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, जीएसटी विभागाचे अतिरिक्त आयुक्त संजीव पाटील, जीतो पुणेचे जिनेंद्र लोढा आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीतो पुणेचे माजी मुख्य सचिव पंकज कर्नावट व मुग्धा करंदीकर यांनी केले.
“जीतो अपेक्सा च्या अध्यक्षपदी नियुक्ती होणे ही अतिशय आनंदाची बाब आहे. आतापर्यंतच्या वाटचालीत जीतो, लायन्स, युगल धर्म संघ आणि इतर अनेक संस्थांच्या माध्यमातून मी जे काम करू शकलो त्यामागे माझे सर्व सहकारी, मित्र, परिवार आणि गुरुंचे पाठबळ आहे. तुमच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो. तुमच्या प्रती मी सदैव कृतज्ञ राहील. यापुढच्या काळात अधिक समाजोपयोगी कार्य करायचे आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ आवश्यक आहे. माझ्यासह इंदर जैन यांनाही सर्वोत्कृष्ट कार्यासाठी संधी मिळाली आहे. तेदेखील उत्तम काम करतील हा विश्वास आहे. येणाऱ्या काळात देशात प्रत्येक १० अधिकाऱ्यांच्या मागे १ जैन अधिकारी असेल असे लक्ष्य ठेवून आपल्याला काम करायचे आहे. याबरोबरच उद्योग व व्यापारात संपूर्ण जगभर नेटवर्क उभारण्याचे लक्ष असून जैन समाज उद्योग व व्यापारात अग्रेसर राहील यासाठी जीतो महत्वाची भूमिका बजावेल. प्रवीणऋषी म.सा. माझी आई, पत्नी भारती, भाऊ चेतन आणि संपूर्ण परिवाराची मला मोठी साथ मिळाली. कुटुंबाची साथ मिळाली तर माझ्या सारखे अनेक विजय भंडारी तयारी होतील असे प्रतिपादन जितो चे राष्ट्रीय अध्यक्ष 
विजय भंडारी यांनी केले.
जैन समाज हा अल्पसंख्यांक आहे. त्यामुळे राजकारणात आपण फारसे यशस्वी होऊ शकत नाही. परंतु, प्रशासनात आपली अनेक गुणवान मुले काम करू शकतात. या भावनेने जेएटीएफ ची स्थापना झाली. गेल्या १२ वर्षांपूर्वी आपण हे स्वप्न पाहिले आणि ते तेव्हापासून वास्तवात येऊ लागले. आता भारतीय प्रशासन सेवेत आपली अनेक मुले देशसेवा करीत आहेत. मी दिल्लीचा असलो तरी पुणेकरांनी मला स्वीकारले असून मी आता पुणेकर झालो आहे. पुणेकरांनी जे प्रेम आजपर्यंत दिले आहे. त्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे. येणाऱ्या काळात अधिक समाजोपयोगी काम आपल्याला करायचे आहे. ते आपण सर्व मिळून करू अशी ग्वाही जेएटीएफ राष्ट्रीय अध्यक्ष इंदर जैन यांनी दिली.
विजय भंडारी आणि इंदर जैन या दोन पुणेकरांची जीतोच्या राष्ट्रीय स्तरावर महत्वाच्या पदावर नियुक्ती झाली याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान असून त्यांच्या कालावधीत जीतो चे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्य दूरदृष्टीचे, अष्टपैलू, महत्वपूर्ण व लक्षवेधी असेल असे मत सिद्धीविनायक ग्रुपचे प्रमुख राजेश सांकला, प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ विधीज्ञ एस. के. जैन, जीतो ॲपेक्स चे माजी अध्यक्ष कांतिलाल ओसवाल,भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा, लायन्स क्लब चे
द्वारका जालान, जीतो पुणेचे माजी अध्यक्ष
अचल जैन, रविराज ग्रुप चे प्रमुख रवींद्र सांकला, लायन्स क्लब चे राज मुच्छाल, जीतो ॲपेक्स च्या संचालिका प्रियांका परमार,जीतो पुणे चे अध्यक्ष इंदर छाजेड, पुणे सकल जैन संघ
चे विलास राठोड, सिद्धी फाउंडेशन मनोज छाजेड, युगल धर्म संघ चे मंगेश कटारिया, दि पूना मर्चंट्स चेंबर चे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...