मुख्य सामग्रीवर वगळा

*इंदापूर शहर व तालुक्यात किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत. प्रमुख तिन्ही उमेदवारांनी आपल्या कुटुंबासह मतदान करत केला विजयाचा दावा !*

इंदापूर, डॉ. संदेश शहा.
इंदापूर विधानसभा मतदार संघात सायंकाळी पाच वाजे पर्यंत सुमारे ६४.४४ टक्के मतदान झाले असून अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा होत्या. रात्री उशिरा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार इंदापूर तालुक्यात ७६.१० टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीत ७६.३४ टक्के मतदान झाले होते. यंदा मागील निवडणुकीपेक्षा मतदानात पॉईंट २४ टक्के घट झाली आहे. तरी देखील या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. त्यामुळे मतदान कुणाला तारणार व कुणाला पाडणार यासंदर्भात खमंग चर्चा सर्वत्र रंगली असून इंदापूर येथे धक्कादायक निकाल लागेल अशी सर्वत्र चर्चा आहे. नेते आता निकालासाठी घड्याळाकडे पहात आहेत तर कार्यकर्ते विजयासाठी तुतारी सज्ज ठेवत आहेत तर काही कार्यकर्ते किटली तील गरम चहा देवून निकालाची वाट पहात आहेत !
दरम्यान विद्यमान आमदार तथा महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री तथा महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील, अपक्ष उमेदवार प्रविण माने यांनी आपल्या कुटुंबासह मतदान करून विजयाचा दावा केला.
दत्तात्रय भरणे यांनी भरणेवाडी येथे पत्नी सौ. सारिका, पुत्र 
श्रीराज, सर्व बंधू तसेच कुटुंबीयांसह मतदान केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून तालुक्यात झालेली विकासकामे, सहकारी पक्षांची त्यास मिळालेली साथ तसेच सर्व सामान्य जनतेचा मिळालेला प्रतिसाद यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा दावा दत्तात्रय भरणे यांनी केला. शिरसटवाडी येथे आमदार भरणे यांची तेथे उपस्थित विरोधी नेते व कार्यकर्ते यांच्याशी शाब्दिक चकमक झाली.
हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे पत्नी सौ. भाग्यश्री, पुत्र राजवर्धन तसेच कन्या सौ. अंकिता पाटील ठाकरे यांच्या सह मतदान केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची पारंपरिक मते, त्यास महाविकास आघाडीचे सर्व पक्षांनी दिलेली साथ, आपली पारंपरिक मते लक्षात घेवून आपला विजय निश्चित असल्याचा दावा हर्षवर्धन पाटील यांनी केला.
प्रविण माने यांनी रुई येथे पत्नी सौ. मयुरी, बहीण तेजश्री, वडील दशरथ माने , चुलते हरिकाका व विष्णू कुमार माने तसेच आपल्या कुटुंबा समवेत मतदान केले. 
यावेळी लोकशाहीत जनता जनार्दन श्रेष्ठ असून जनतेने परिवर्तन करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा दावा प्रविण माने यांनी केला आहे.
इंदापूर तालुक्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत केवळ ५.०५ टक्के, अकरा वाजेपर्यंत १६.२० टक्के, दुपारी १ वाजे पर्यंत २९.५० टक्के, ३ वाजे पर्यंत ४९.५० टक्के, पाच वाजेपर्यंत ६४.४४ टक्के तर सहा वाजेपर्यंत ७६.१० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याण पांढरे, सहाय्यक निवडणूक अधिकारी जीवन सरवदे यांनी दिली. दरम्यान सायंकाळी सहा वाजेपर्यंत कालठण नंबर एक मध्ये मोठ्या रांगा असल्याची माहिती पत्रकार काकासाहेब मांढरे व नितीन दीक्षित यांनी दिली. मतदान प्रक्रिया सुरू असताना लाखेवाडी येथे एका वर हल्ला करण्यात आला. हल्ला झालेला कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा असल्याचे समजते. इंदापूर शहरात सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका श्रीमती नीला शरदकुमार शहा यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी मतदान केले. यावेळी हुमड जैन फेडरेशन चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, पत्नी सौ. संगीता शहा, कन्या डॉ. सुश्मिता शहा, चिरंजीव दर्शन शहा यांच्या समवेत मतदान केले.  नगराध्यक्षा सौ. अंकिता शहा, शहा ग्लोबल स्कूल चे विश्वस्त मुकुंद शहा, माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, उद्योजक अंगद शहा व शहा परिवाराने इंदापूर येथे मतदान केले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप 
गारटकर यांनी आपल्या कुटुंबासह इंदापूर येथे मतदान केले. आमदार दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या विकासकामा वर निश्चित विजयी होतील. त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिळालेली साथ महत्त्वाची असल्याने ते विजयाची हॅटट्रिक करतील असा विश्वास प्रदीप गारटकर, विधीज्ञ सचिन राऊत, अतुल झगडे यांनी व्यक्त केला.
यंदा जनतेने परिवर्तन करायचे ठरविले असल्याने नको आजी व माजी, आम्हाला हवा आहे नवीन बाजी या तत्त्वानुसार प्रविणभैय्या माने विजयी होवून इतिहास घडवतील असा विश्वास बापू जामदार, अमोल मुळे विकास खिलारे यांनी व्यक्त केला.
लोकसभेप्रमाणे यंदाची निवडणूक जनतेने हाती घेतली होती. त्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेकांचे आशीर्वाद लाभले. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यंदा विजयाची शंभर टक्के हॅटट्रिक करतील अशी खात्री कैलास कदम, सागर मिसाळ, शेखर पाटील, गोरख शिंदे, डॉ. रियाज पठाण, विधीज्ञ आशुतोष भोसले यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...