मुख्य सामग्रीवर वगळा

*माझा प्रवीण जनसेवे साठी तुमच्या स्वाधीन केला आहे, त्याचा सांभाळ करा - दशरथ माने. सांगता सभेत प्रविण माने यांनी स्टॅम्प पेपरवर लिहिलेला वचननामा दाखवून दिली तालुक्याच्या विकासाची खात्री !*

इंदापूर, डॉ. संदेश शहा.
प्रवीणभैय्या हा जाती पातीचे राजकारणाला थारा न देता सर्वधर्म समभाव केंद्रस्थानी मानून काम करणारा नेता असून गरिबांच्या उपयोगी पडणारा, संकटकाळात धावून जाणारा कर्तबगार युवक आहे. तो माझा पोरगा असून तो तुमच्या स्वाधीन करतोय, त्याचा सांभाळ करायची जबाबदारी तुम्हा सर्वांवर आहे. सणसर येथील सभेत आमचे दैवत शरद पवार यांनी प्रविण भैय्या याचे नाव देखील न घेता ऊसाला कमी दर देणाऱ्या कारखानदारांना पाडा असा संदेश दिला आहे. त्यामुळे समजने वालो को इशारा काफी है असे म्हणत सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने यांनी प्रविण माने यास विजयी करून विधानसभेत पाठवा, तालुक्याचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे सूतोवाच केले! परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण माने यांना मतदानरूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने यांनी केले.
दशरथ माने पुढे म्हणाले, प्रवीण ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करणारा पोरगा आहे. त्याने कोरोनाच्या काळामध्ये गोरगरिबांच्या घरांमध्ये २५ हजार धान्याचे किट हाताने भरून दिले आहे. व्हेंटिलेटर, रेमडिसिवीर स्वःखर्चांनी देऊन अनेक रुग्णांचे जीव वाचविणारा तो देवदूत आहे. गरिबांच्या उपयोगी पडणारा असा पोरगा आहे, परंतु त्याला निवडणुकीत बाळ म्हणून त्याला  
हिणवलं जातंय. पण, याच बाळाला २३ तारखेला महाराष्ट्र हुडकायला येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सणसर येथील सभेत शरद पवार यांनी सोमेश्वर साखर कारखाना ३७०० रुपये, माळेगाव साखर कारखाना ३६०० दर देतो, छत्रपती कारखाना ३ हजार रुपये दर देतो, असे सांगत कमी दर देणाऱ्या कारखानदारा ला मते देऊ नका, असा इशारा दिला. त्यावेळी आपल्या नेत्याला आपल्या कारखान्याचे नाव येते की, काय म्हणून घाम फुटला होता. यामध्ये कुठे देखील प्रवीण माने यांच्याविषयी शरद पवार यांनी ब्र शब्द कधी काढला नाही. कमी दर देणाऱ्या लोकांना पाडा, असा इशारा शरद पवार यांनी दिल्याने तो 'इशारा समझनेवालो को काफी है' असे दशरथ माने म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. 
मी हातात माती घेतली तर तिचं सोनं करणारा माणूस आहे. एकदा काम हातात घेतलं की ते पूर्णच करतो. अनेकांना घरातून बाहेर येऊ नये म्हणून दबाव आहे. पण, सर्वजण आम्ही तुम्हाला मतदान करू, असे सांगत आहेत 'ये अंदर की बात है' असे दशरथ माने म्हणताच सभेत हशा पिकला.
यावेळी उमेदवार प्रविण माने म्हणाले, ज्याप्रमाणे आम्ही दुधाची कोंडी फोडली, त्याप्रमाणेच आम्ही ऊसाची देखील कोंडी फोडून शेतकऱ्यांना न्याय देवू. आमचे अनेक गावात बॅनर फाडले, आमच्या कार्यकर्त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या, मात्र आम्ही खालच्या पातळीवर येवून राजकारण करणार नाही तर आम्ही विकासाचे राजकारण करणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा लाईट देणार आहे तर उजनी पाणलोट क्षेत्रात पडस्थळ, गंगावळण, कुंभारगाव येथे पर्यटन विकसित करणार आहे. साखर कारखाना, टेक्सटाइल पार्क, फूड इंडस्ट्रीव्दारे हजारो युवा पिढीस नोकरी देणार आहे. जनतेचा सेवक म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून आणलेला वचननामा वाचून दाखविला. हात दाखवा, आमदार थांबवा, मी व माझे कुटुंबीय कोणतेही कंत्राट घेणार नाही, आमदारकीचे मानधन गरीब मुलींच्या शिक्षण व आरोग्यावर खर्च करणार, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज मार्गदर्शन केंद्र सुरू करणार, औद्योगिक वसाहती मध्ये युवा पिढीच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार, शेतकऱ्यांचा ऊस गाळप व शाश्वत पाण्यासाठी टोकाचा संघर्ष करणार तसेच 
भ्रष्ट्राचार झाल्यास राजकीय संन्यास घेणार ही वचने प्रविण भैय्या यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
यावेळी बाजार समितीचे उपसभापती मनोहर ढुके,बापूराव जामदार, माजी सभापती मयूरसिंह पाटील, ज्येष्ठ नेते बाबासाहेब चवरे, दादा थोरात, शरद चितारे, विक्रम शेलार, उमेश घोगरे, आझाद मुलाणी, समद सय्यद, भैय्या कोकाटे, विजय भरणे, विकास खिलारे, अनिल ढावरे आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...