मुख्य सामग्रीवर वगळा

*चांदणी चौक दिगंबर जैन मंदिर मध्ये दशलक्षण महापर्व निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, पालखी सोहळा, उपवास व्रतीं ची शोभायात्रा तसेच पारणे सोहळा संपन्न*

इंदापूर, डॉ. संदेश शहा.
पुणे चांदणी चौक येथील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर मध्ये, दिगंबर जैन समाजाचे भाद्रपद दशलक्षण महापर्व विविध पारंपरिक धार्मिक उपक्रमांनी संपन्न झाले. 
या पर्वाची बुधवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी षोडषकारण व्रता पासून सुरूवात होवून बुधवार दिनांक सप्टेंबर रोजी अनंत पौर्णिमेच्या दिवशी क्षमावाणी या कार्यक्रमाने दशलक्षण धर्मपर्वाची समाप्ती मोठ्या उत्साहात पालखी मिरवणुकीने झाली.
यानिमित्त जैन मंदिर मध्ये भव्य मंडप उभारण्यात आला होता. यावेळी सामूहिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. मंदिरावर करण्यात आलेली नेत्रदीपक विद्युत रोषणाई सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या दशलक्षण धर्म पर्वा मध्ये दररोज जैन मंदिरामध्ये सकाळी महाभिषेक, विश्र्वशांती साठी महाशांती धारा, दशलक्षण पर्व पूजन, सायंकाळी मंगल आरती व त्यानंतर सांगानेर ( राजस्थान) येथील अवनीश शास्त्री यांचे दररोज दशधर्मावर प्रवचन इत्यादी विविध धार्मिक कार्यक्रमांचे नित्यनियमाने बारा दिवस आयोजन करण्यात आले. या दशलक्षण धर्मपर्वात उत्तम क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, संयम, तप, त्याग, अकिंचन आणि उत्तम ब्रह्मचर्य दशलक्षणांची पूजा करण्यात आली. दिगंबर जैन समाजात या दशलक्षण धर्म पर्व काळात उपवास, स्वाध्याय, तप, त्याग आदी उपक्रम मोठ्या प्रमाणात संपन्न झाले. रविवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी जैन समाजातील विविध लहान मुलांचे तसेच पाठशाळेतील मुलांचे विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांचा गौरव करण्यात आला.
बुधवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी अनंत पौर्णिमेच्या दिवशी क्षमावली निमित्ताने दशलक्षण समाप्ती भव्य पालखी मिरवणूक सोहळ्याने झाली. चांदीच्या पालखी मध्ये भगवान महावीरांची प्रतिमा विराजमान करण्यात आली होती. १० दिवस निरंकार उपवास केलेले दिनेश गणेशवाडे, प्रीती पाटील तर पंचमेरूचे ५ उपवास केलेले ज्योती शहा व वासंती देशमाने यांची जैन धर्म प्रभावानेसाठी बग्गी रथातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंगेश ब्रास बँड यांचे सुमधुर बँड वादनाने जैन युवक युवतींनी गरबा नृत्य करीत आनंद लुटला.
त्यानंतर दहा दिवस निरंकार उपवास केलेल्या व्रतींचा पारणे कार्यक्रम मंदिरच्या स्वाध्याय हॉल मध्ये संपन्न झाला. त्यानंतर विविध धार्मिक कार्यात ज्यांनी योगदान दिले त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भगवान महावीर मंडळ व श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिराचे विश्वस्त दिनेश गणेशवाडे, मोहन कुडचे, उदय लेंगडे, अजित शेट्टी, सुनील बिरनाळे, ज्योती बुरसे, शोभा पोकळे, प्रीतम मेहता, प्रकाश कुडचे, तात्यासाहेब खोत, अशोक मगदूम आदी विश्वस्त उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते