मुख्य सामग्रीवर वगळा

*युवाक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक प्रशांत शिताप यांचे हस्ते जिजाऊ इन्स्टिट्युट कालठण येथे ध्वजारोहण*

 इंदापूर जिजाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश मिडीयम आणि ज्युनिअर कॉलेजचे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहनाचा मान सामान्य कार्यकर्त्याला मिळाला कॉलेजच्या प्रिन्सिपॉल राजश्री जगताप आणि शिक्षकांचे मी मना पासून आभार मानतो आमच्या गुरवर्या प्रा.जयश्री गटकुळ( माई) आणि गटकुळ सरांचा दिलेल्या सन्मान बद्दल मी ऋणी आहे.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या गोर गरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून या दांपत्याने उभारलेला हा ज्ञानयज्ञ कौतुकास पात्र ठरत आहे.
नृत्य लेझिम स्व संरक्षणार्थ कराटे लाठी काठी..हिंदी इंग्रजी मराठी भाषेतील प्रभुत्व वक्तृत्व शेतकऱ्यांच्या लहान लहान मुला मधील स्टेज डेअरिंग संभाषण कौशल्य खूपच प्रभावी पने विद्यार्थ्यांत रुजवले आहेत 
निसर्ग सानिध्यात शांत वातावरणात भव्य अशी जीम , स्विमिंग पुल, सायन्स लॅब, सर्व सुविधासह जिजाऊ इन्स्टिट्युटची वास्तू आणि कोट्यवधी रुपयांची जमीन संस्थेला देऊन प्रा भास्कर गटकुळ यांनी शेतकऱ्याच्या मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी जे कार्य केले आहे ते दीपस्तंभा सारखे आहे... प्रत्येक वेळी ध्वजवंदन सामजिक कार्यकर्ता, स्वातंत्र्यसैनिक, शेतकरी , महिला भगिनी आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्याच्या हातून करतात हा आदर्श आजच्या शिक्षणसम्राटांनी घेतला पाहिजे विद्यार्थ्याचे भवित्व्य आणि विद्यार्थी हिताची काळजी घेणारे प्रेमळ तितकेच शिस्त प्रिय शिक्षक आहेत

मुलांशी सवांद साधताना मी विद्यार्थ्यांनाआपल्या आई वडिलांच्या आपल्या गुरूंच्या नजरेतला चांगला मुलगा/मुलगी आदर्श विद्यार्थी बनायचं प्रामाणिक प्रयत्न करा... आणि भारतीय ही आपली सर्वात मोठी ओळख आहे ती जपू या...
ज्या दिवशी इथल्या मंदिर मस्जिद देवालय सर्व धर्मीय प्रार्थना स्थळा वर तिरंगा सर्वोच्य स्थानी फडकेल...
ज्या दिवशी जाती धर्म प्रांत याच्या वर आपल राष्ट्रीयत्व निर्विवाद असेल...
ज्या दिवशी आपण स्वताला फक्त आणि फक्त भारतीय मानू...

त्या दिवशी माझा तुमचा आपल्या सर्वांचा हा भारत देश जागतिक महासत्ता बनल्या शिवाय राहणार नाही..!🙏🏽
*चला भारतीय बनू !* अस आवाहन या उद्याच्या माझ्या देशाच्या तरुणाई ल आवाहन करीत मी माझा सवांद संपविला.
*एका गुरूने दिलेला सन्मान हा केवळ आणि केवळ युवा क्रांती प्रतिष्ठान चे सर्व सज्जन सहकाऱ्यांच्या सामाजिक कार्यास समर्पित*


*जय हिंद*🙏🏽🧡🤍💚🙏🏽

*Proud Indian*
प्रशांत उषा भानुदास शिताप

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...