*रसायनशास्त्र म्हणजे काय*
रसायनशास्त्र (इंग्लिश: केमिस्ट्री) म्हणजे पदार्थाचे गुणधर्म व त्याची स्थित्यंतरे अभ्यासणारे विज्ञान आहे. विविध पदार्थ, त्यांचे गुणधर्म, तसेच त्यांचे एकमेकांवर होणारे परिणाम यांचा रसायनशास्त्रात अभ्यास होतो.
मानवाला पृथ्वीवर 50 दशलक्ष वेगवेगळी रसायने सापडली आहेत किंवा ती बनवली आहेत,
*भारतातील रसायन उद्योग*
भारतातील रसायन उद्योगमध्ये 80,000 पेक्षा जास्त व्यावसायिक उत्पादने समाविष्ट आहेत . मोठ्या प्रमाणात रसायने, ऍग्रोकेमिकल्स, पेट्रोकेमिकल्स, पॉलिमर आणि खतांमध्ये त्याचे वर्गीकरण केले जाते.
भारतातील रासायनिक उद्योगांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे जी आर्थिक वाढ आणि तांत्रिक प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देते.
*विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी*
स्पेशलायझेशन (मुख्य विषय) निवड हा निर्णय महत्त्वाचा आहे कारण तो तुमच्या करिअरची दिशा ठरवतो. स्पेशलायझेशन्समध्ये बायोकेमिस्ट्री, जिओकेमिस्ट्री, केमिकल इंजिनीअरिंग, केमिकल फिजिक्स, एनव्हायरमेंटल सायन्स, फॉरेन्सिक्स, फार्माकोलॉजी, टॉक्सिकॉलॉजी, ॲग्रीकल्चरल केमिस्ट्री, फूड टेक्नॉलॉजी, मॉलिक्युलर मॉडेलिंग आणि ड्रग डिझाईन आणि रसायनशास्त्रातील कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स यांचा समावेश होतो.
*अकरावी-बारावी नंतर विद्यार्थ्यासाठी पुढे काय?* अकरावी-बारावीमध्ये केमिस्ट्री विषय अनिवार्य असतो. विद्यार्थ्यांना पुढे बीएससी पदवी घेतानाही तो निवडता येतो. बीएससी पदवीनंतर ऑर्गनिक केमिस्ट्री, इनऑर्गनिक, फिजिकल, अनॅलिटीकल आणि बायोकेमिस्ट्री या विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनही करता येते. पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बीएड, सेट, नेट, पीएचडी झाले तर शाळा आणि कनिष्ठ आणि पदवी - पदव्युत्तर महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालय, फार्मसी कॉलेज मध्ये शिक्षक ते सहायक प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी आहे आणि पीएचडीसाठी प्रवेश घेऊन संशोधनाचे कार्य करू शकता. तसेच पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना युजीसीने बायो अनॅलिटीकल सायन्स, न्युट्रसीटीकल सायन्स, बायो इन्फॉर्मेटीव्ह आदी इनोव्हेटिव्ह अभ्यासक्रमांचे काही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. विद्यार्थी पदवीनंतर त्यांचा विचार करू शकतात.
इन्स्ट्रूमेंटेशनसारखे काही अँड ऑन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.हे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या वेळी कुशल मनुष्यबळ म्हणून प्राधान्य दिले जाते.
*करिअर आणि रोजगारच्या कोणत्या संधी आहेत?*
अनॅलिटीकल, ड्रग/फार्मास्यूटिक्ल् केमिस्ट्री अभ्यास पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना औषध कंपन्यांमध्ये खूप मागणी आहे. तर ऑर्गनिक केमिस्ट्री केलेल्या विद्यार्थ्यांना केमिकल कंपन्यांमध्ये नोकरीच्या उत्तम संधी आहेत. अनेक इंटरनॅशनल केमिकल कंपनी मध्ये विद्यार्थ्यांना वार्षिक तीस ते चाळीस लाखाचे पॅकेज दिले जाते. रसायनशास्त्र विषय घेतलेला विद्यार्थी शासकीय विभाग, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रात नोकरी मिळवू शकतो आणि स्पर्धात्मक परीक्षाअंतर्गत एमपीएससी/यूपीएससी परीक्षा पास झाला तर शासकीय विभागात शासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती होते.
*भारतावर रासायनिक उद्योगांचा प्रभाव*
भारतातील रासायनिक उद्योगांची आर्थिक वाढ आणि तांत्रिक प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकाआहे. भारताला इतरांवर अवलंबून न ठेवणारे स्वतंत्र राष्ट्र बनवण्यासाठी कृषी, औषधनिर्माण आणि उत्पादन क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
टिप्पण्या