मुख्य सामग्रीवर वगळा

*रोटरी क्लब इंदापूरच्या 2024 चे अध्यक्षपदी एडवोकेट मोरेश्वर कृष्णा कोकरे*


इंदापूर मध्ये झालेल्या भव्य अशा कार्यक्रमात रोटरी क्लब इंदापूर चे संस्थापक अध्यक्ष मा.प्रदीप  गारटकर,मा.मुकुंदशेठ शहा माजी अध्यक्ष आझाद पटेल तसेच रोटरी डिस्ट्रिक्ट 31 चे डी जी इ रोटरी संतोष मराठे आणि ए जी दत्तात्रय बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत 2024 25 या वर्षासाठीची अध्यक्षपदाची जबाबदारी रोटरीन मोरेश्वर कोकरे यांना देण्यात आले चाळीसहून अधिक सदस्यांनी पदग्रहण केलं 19 बी ओ डी नी शपथ घेतली यावेळी मार्गदर्शन करताना रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप दादा गारटकर यांनी रोटरी चे सामाजिक योगदान कार्यकाराची पद्धती आणि ग्रामीण भागातील तरुणांना नेतृत्व करायचे संधी याद्वारे मिळते रोटरी इंटरनॅशनल या संस्थेद्वारे सर्व क्षेत्रातील चांगल्या लोकांची शक्ती एक संघटन तयार करून समाजासाठी त्याचा सकारात्मक वापर करण्याचे एक संधी रोटरीच्या माध्यमातून दिली जाते असे सांगितले गतवर्षीचे अध्यक्ष आझाद पटेल यांनी आपल्या सहकाऱ्यांचे दिलेल्या सहकार्याबद्दल आणि चांगलं काम करायची संधी दिल्याबद्दल  रोटरी क्लबचे आभार व्यक्त केले नूतन अध्यक्ष एडवोकेट मोरेश्वर कोकरे यांनी आपल्या भाषणात एका शेतकरी कुटुंबातून एवढ्या मोठ्या संस्थेत काम करायची संधी दिल्याबद्दल आदरणीय प्रदीप दादा गारटकर तसेच वसंतराव माळुंजकर यांचे आभार मानले सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात सर्वसामान्यांना गोरगरिबांना उपयोगी पडेल असे कार्य वर्षभरात रोटरी क्लबच्या माध्यमातून केले जाईल अशी ग्वाही  दिली,इंदापूर सरडेवाडी शहा तालुक्यातील विविध ठिकाणावरून वेगवेगळ्या सामाजिक संघटनातून शेतकरी बागायतदार व्यापारी वकील माजी सैनिक सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या रोटरी क्लबचे सदस्य या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. उपस्थित मित्रपरिवार पाहता एडवोकेट मोरेश्वर कोकरे यावर्षी रोटरी क्लब ची कारकीर्द नक्कीच गाजवणार असे सर्वजण म्हणत होते. यावर्षी सामाजिक कार्याचा रोटरी क्लब चा पुरस्कार  जयवंत नायकुडे जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज इंदापूर यांना देण्यात आलाया सुंदर अशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक रोटरी डायरेक्टर प्रशांत घुले आणि प्रशांत शिंताप यांनी केले.
खजिनदार राजाराम सागर यांनी आभार प्रदर्शन केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...