मुख्य सामग्रीवर वगळा

*इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळावर प्रशासक नेमा --- आप्पासाहेब जगदाळे तर गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन*

इंदापूर येथील श्री. नारायणदास रामदास हायस्कूल व ज्यु. कॉलेज येथील कथीत शालेय पोषण आहार योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारा आहार यामध्ये संबंधीत मुख्याध्यापक आणि इतरांनी अपहार केल्याचे चौकशी अहवालावरून सिध्द झाले आहे. शिक्षण अधिकारी (प्राथमिक), पुणे जिल्हा परिषद, पुणे यांनी मुख्याध्यापक, श्री. ना.रा. हायस्कूल व ज्यु. कॉलेज, इंदापूर यांना शापोआ योजना वसुली बाबतचे पत्र जा.क्र.जिप/शिक्षण/प्राथ/ पीएमपोषण /२६४/२०२४ दि.३१/०५/२०२४ प्रमाणे त्यांना रक्कम शासन खाती जमा करण्याचे आदेश दिलेले असताना त्यावर अद्याप काही कारवाही झालेली दिसत नाही. यासाठी इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा यांनी शालेय पोषण आहार योजनेमध्ये झालेल्या अपहाराची चौकशी झालेला अहवाल व कार्यवाहीची अंमलबजावणी तसेच संबंधीतांवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी संबंधित प्रशासनाला निवेदन दिले आहे.

   आप्पासाहेब जगदाळे व भरतशेठ शहा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १९३८ सालापासून इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, इंदापूर यांचे मार्फत हजारो गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे पवित्र कार्य करीत असतानाच हल्ली अशा घटना घडणे ही शोकांतीका आहे. सदर शालेय पोषण आहार योजनेमध्ये अपहार होणे हेच मुळात तालुक्यातील या संस्थेमध्ये शिकणाऱ्या गोर गरीब विद्यर्थ्यांवर अन्याय केल्यासारखे आहे. शासन विविध योजनांद्वारे शिक्षण तळागाळात पोहचवण्याचे काम करत असतानाच श्री.संजय सोरटे यासारखे मुख्याध्यापक आणि त्यांचे भ्रष्ट सहकारी त्यामध्ये पदाचा गैरवापर करत अडथळा आणताना दिसत आहे. सदर श्री.संजय सोरटे ह्यांच्या बद्दल बऱ्याच पालकांची तक्रार असल्याचे समजते. नुकत्याच चालू असलेल्या शालेय ॲडमिशन संदर्भात अत्यंत मुजोरीने बोलणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन संदर्भात आगाऊची प्रवेश शुल्काची मागणी करणे, बंगल्यावर जाऊन भेटा म्हणजे त्यांनी सांगितल्यास ॲडमिशन होईल या सारख्या बऱ्याच तक्रारी पालक बोलून दाखवत आहेत. ही संस्था प्रायव्हेट लि. असल्यासारखा कारभार सद्या चालू आहे. इतके सर्व होत असताना संस्थेमध्ये हा जो अनागोंदी कारभार हे मुख्याध्यापक महाशय करत असताना संस्थाचालक म्हणून अध्यक्ष आणि त्यांचे संचालक मंडळ हे जाणिवपूर्वक याकडे कानाडोळा करत आहेत. तरी सदरील प्रकरण हे विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे म्हणून याची गंभीर दखल घेऊन संबंधीतावर कडक कार्यवाही व्हावी आणि जो काही अपहार झाला आहे त्याची पाळेमुळे शोधून काढून कायदेशीर कठोर कार्यवाही करावी. सदर निःष्पक्ष चौकशी होई पर्यंत संस्थेवर प्रशासक नेमावा अशा आशयाचे निवेदन गटविकास अधिकारी इंदापूर यांना दिले आहे.यावेळी प्रशांत उंबरे, शकिलभाई सय्यद, गणेश महाजन, अभिजीत अवघडे, अशोक चव्हाण, अक्षय सूर्यवंशी, सुनील तळेकर, प्रमोद राऊत, अमोल माने उपस्थित होते.

******************************************************

तालुक्याचे आदराचे स्थान असणारे स्वातंत्र्यसेनानी, शिक्षण महर्षी वैकुंठवासी नारायणदास रामदास शहा यांची त्यांनीच स्थापन केलेल्या इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळातील काही जणांनी चालवलेली अवहेलना थांबवून शहा यांचा सन्मान त्यांना परत द्या. सन १९३८ ते १९५४ या कालावधीत  वैकुंठवासी नारायणदास रामदास शहा हे इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात शहा कुटुंबातील वैकुंठवासी गोकुळदास शहा, त्यांचे पुत्र मुकुंद शहा यांनी तालुका शिक्षण प्रसारक मंडळात पदे भूषवून जबाबदारीने कामकाज केले आहे. या पार्श्वभूमीवर आत्ताच्या इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष व संचालक मंडळाने नारायणदास शहा व शहा कुटुंबाचे इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ व शिक्षण, शाळा महाविद्यालयाच्या उभारणीत असणारे योगदान पुसण्याचा, त्यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे.  शाळेच्या गणवेशाच्या बॅचवरील नारायणदास रामदास शहा यांचे नाव जाणीवपूर्वक काढून टाकण्यात आले आहे. हा नारायणदास शहा यांचा व त्यांच्या शिक्षणविषयक कार्याचा सरळसरळ अवमान आहे. याचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो. यासंदर्भात कोणी आवाज उठवला नाही तर हे कुटील प्रयत्न सुरु राहून तालुका शिक्षण प्रसारक मंडळ ही सार्वभौम लोकशाहीच्या मार्गाने चालणारी संस्था एकाधिकारशाहीच्या अंमलाखाली येईल ही वस्तुस्थिती आहे. त्यास अटकाव व्हावा यासाठी गणवेशावरील बॅचमध्ये पूर्वीप्रमाणे नारायणदास शहा यांचा नामोल्लेख असणारा मजकूर टाकला जावा अशी आमची मागणी आहे. या मागणीचा विचार व्हावा. नारायणदास शहा यांना त्यांचा सन्मान परत मिळावा. मागणीचा विचार झाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत.

-- भरतशेठ शहा माजी उपनगराध्यक्ष इंदापूर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते