मुख्य सामग्रीवर वगळा

*यवतमाळ येथील घटना महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यावर शाई फेकून विटंबना करणा-या चा इंदापूरात जाहीर निषेध -अशोकराव देवकर*

इंदापूर:-यवतमाळ येथील महात्मा फुले चौक येथे असलेल्या भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या यांच्या पुतळ्यावर शाई फेकून विटंबना करणाय चा जाहीर निषेध व संबंधितावर कारवाई करण्यासाठी इंदापूर तहसीलदार श्रीकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले, .दिनांक २१ एप्रिल २०२४ रोजी राष्ट्रपिता फुले यांच्या जयंती महिन्यातच महात्मा फुले चौक यवतमाळ येथील राष्ट्रपिता फुले यांच्या पुतळ्यावर कोण्या तरी समाजकंटकाने शाईफेकून विटंबना केलेली आहे. त्याचा आम्ही संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आसे मत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पै.श्री. अशोक बाबु देवकर संघटक, पुणे जिल्हा यांनी व्यक्त केले. पुढे निवेदनात नमूद करण्यात आले की, ज्या महामानवाने या देशातील शिक्षणाचा पाया घातला बहुजन समाजाला शिक्षणाच्या वाटा खुल्या करून दिल्या समता प्रस्थापित करण्यासाठी काम केले, सत्याचा शोध घेण्यासाठी सत्यशोधक चळवळ उभी केली. अशा महामानवाच्या पुतळ्याच्या पाठीवर शाई फेकणाऱ्या व्यक्तीचा आणि प्रवृत्तींचा आम्ही जाहीर निषेध कस्तो. अशा मानवतावाद विरोधी प्रवृती शिक्षेस पात्र आहेत.सदर प्रकाराची स्वतंत्र चौकशी पथकाद्वारे चौकशी करून महामानवाची विटंबना करणाऱ्या व्यक्ती व प्रवृतींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात याची व भविष्यकाळामध्ये अशा प्रकारचे गुन्हे घडू नयेत म्हणून योग्य ती उपाययोजना करण्यात यावी ही विनंती. अन्यथा संघटनेच्या वतीने शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल.आसा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद श्री. अशोक बाबु देवकर संघटक, पुणे जिल्हा यांनी दिला या निवेदनाच्याप्रती ,मा.श्री. छगन भुजबळ साहेब संस्थापक/अध्यक्ष,मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई-३२मा. तहसिलदार  तहसिल कार्यालय इंदापूर ता. इंदापूर जि. पुणे यांना पाठविण्यात आल्या, या वेळी कृष्णाजी यादव, अनिल राऊत, पोपट शिंदे,रमेश शिंदे,नागनाथ व्यवहारे बाळासाहेब व्यवहारे सह इतर मान्यवर उपस्थित होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...