मुख्य सामग्रीवर वगळा

*विधानसभेचा निर्णय नंतर घेऊ.आता लोकसभेचा प्रचार करा देवेंद्र फडणवीसांच्या शिष्टाईला यशअजित पवार -हर्षवर्धन पाटील यांची दिलजमाई*

इंदापूर

-अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील संघर्ष सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली शिष्टाई अखेर यशस्वी ठरली. 'बारामती मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करा,' अशा शब्दांत फडणवीस यांनी पाटील यांना समज दिल्याचे समजते. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी पुकारलेले बंड अखेर थंड झाले आहे. पुढील आठवड्यात इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्याची तयारी करण्याची सूचना फडणवीस यांनी पाटील यांनाकेली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे. त्या संदर्भात महायुतीतील,भाजपचे नेते आणि माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले;तसेच तालुक्यात कार्यकत्यांचे मेळावे घेऊन दबाव गट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नाला काही प्रमाणात हर्षवर्धन पाटील यांना यश आले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन  पाटील साहेब यांना चर्चेसाठी बोलावले होते. त्या वेळी त्यांनी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून येणाऱ्या धमक्या आणि अर्वाच्य शब्दांत होणारी शिवीगाळ यांसारख्या तक्रारी फडणवीस यांच्याकडे केल्या. त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन फडणवीसांनी दिले होते. त्यानुसार, फडणवीसांनी पुन्हा रविवारी रात्री 'सागर' बंगल्यावर हर्षवर्धन यांच्याशी बारामती मतदारसंघाबाबत दोन तास चर्चा केली.

'बारामतीतील महायुतीच्या उमेदवाराच्या बाजूने प्रचार करा,' अशा शब्दांत हर्षवर्धन यांना फडणवीस यांनी समज दिल्याचे सांगितले जात आहे; तसेच 'कार्यकत्यांनाही तशी समज द्या. विधानसभेचा निर्णय नंतर घेऊ. आता लोकसभेचा प्रचार करा,' अशी सूचना फडणवीसांनी हर्षवर्धन यांना केली. इंदापूर तालुक्यात पुढील आठवड्यात भाजपचा मेळावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्वतः फडणवीस हे मेळाव्यासाठी येणार आहे. त्याची तयारी करा, असेही त्यांना सांगण्यात आले आहे; तसेच हर्षवर्धन पाटील
यांना समज दिल्यानंतर

फडणवीस यांनी अजित पवार यांच्याशी फोनवर या संदर्भात चर्चा केली आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील सुप्त संघर्ष सध्या तरी शांत झाल्याचे मानले जात आहे.आशी सर्वत्र चर्चा आहे, 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...