मुख्य सामग्रीवर वगळा

शिवसृष्टी न्युज लक्ष्मी वैभव न्युज

भारताची जगात प्रतिमा उंचावण्याची काम नरेंद्र मोदींनी केले -हर्षवर्धन पाटील

इंदापूर : प्रतिनिधी 


नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व विश्वव्यापी असल्याचे सिद्ध झाले आहे. भारताची प्रतिमा जगात उंचावण्याची काम नरेंद्र मोदींनी कर्तबगारीने केले आहे. जगामध्ये व देशात नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे, असे गौरवद्गार भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे पत्रकार परिषदेत शनिवारी (दि.3) काढले.
देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केंद्र सरकारच्या कामगिरीची माहिती या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील यांनी दिली. भाजपने सन 2019 ला देशात 303 जागा जिंकल्या होत्या. तर आता सन 2024 ला भाजपचे 350 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आहे, तर एनडीए (NDA) एकूण 400 जागा मिळतील, असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली भाजपचे सरकार दि. 26 मे 2014 रोजी स्थापन झाले, त्यास आता 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. जगातील लोकप्रिय नेत्यांमध्ये नरेंद्र मोदींचा समावेश होत आहे, ही प्रत्येक भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे भाजप ब्रीदवाक्य असून त्यानुसार केंद्र सरकार काम करीत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जे.पी. नड्डा जी यांनी 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दि.31 मे ते 30 जून या कालावधीत देशभर महासंपर्क अभियान सुरू केले आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6 हजार रुपये देण्यात येत आहे. तसेच फक्त 1 रुपयांमध्ये शेतकऱ्यांना पिक विमा दिला जाणार आहे. जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द करण्यात आले. आयुष्यमान भारत योजनेसाठी गोल्डन कार्ड नागरिकांना देण्यात येत आहे. देशातील 55 कोटी जनतेला या योजनेचा लाभ होत आहे. इंदापूर तालुक्यातील आपण ही योजना राबविण्यासाठी शिबिरे घेतली.
देशाचे पहिले सहकारी मंत्री म्हणून अमित शाह यांनी देशातील सहकार चळवळ मजबुतीसाठी अनेक धाडसी निर्णय घेत आहेत. कोविड काळात देशातील 82 कोटी जनतेला मोफत धान्य दिले. सध्या चालु असलेल्या सन 2023 या वर्षात देशातील जनतेला पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत वर्षभर मोफत धान्य दिले जात आहे,असे ते म्हणाले.
देशात अनेक महामार्गाचे जाळे निर्माण केले, तसेच मेट्रोचे जाळे निर्माण केले. सुविधा उपलब्ध केल्याने विमान प्रवास वाढला आहे. केंद्र सरकारकडून ' हर घर हर जल ' योजना राबविली जात आहे. त्याचा लाभ पुणे जिल्ह्यातील प्रत्येक गावाला मिळत आहे. इंदापूर तालुक्यामध्ये 1353 कोटी रुपयांचा निधी केंद्र व राज्य सरकारने हरघर हरजल योजनेसाठी दिला आहे. कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होणेसाठी कामातील अनियमितता खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी दिला. महासंपर्क अभियानाच्या कालावधीमध्ये सोशल मीडिया, रॅली, लाभार्थी मिळावे, प्रत्येक तालुक्यातील 10 हजार नागरिकांना कार्यकर्ते हे भेटणार आहेत, अशी माहिती यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
चौकट :-
---------
बारामती मतदारसंघाच्या महासंपर्क अभियान प्रमुखपदी हर्षवर्धन पाटील.

-------------------------------------------
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जे.पी. नड्डा जी यांनी 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दि.31 मे ते 30 जून या कालावधीत देशभर महासंपर्क अभियान सुरू केले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाभियानाचे प्रमुख भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे आहेत. तर तीन लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख म्हणून केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल हे जबाबदारी पार पाडत आहेत.

चौकट :-
-----------
अमित शाह चालू महिन्यात बारामती मतदारसंघात येणार - हर्षवर्धन पाटील
------------------------------------

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महासंपर्क अभियानामध्ये केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह हे चालू जून महिन्यात सहभागी होणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची वेळ व कार्यक्रमाचे ठिकाण याची माहिती लवकर दिली जाईल, असे यावेळी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अँड शरद जामदार यांनी आभार इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी मानले.
या कार्यक्रमास माऊली चवरे बापूराव जामदार सचिन जामदार गलांडवाडी चे सरपंच गोपीचंद गलांडे संदीप चव्हाण दादासाहेब पिसे अविनाश कोथमीरे ,धनंजय पाटील,सागर गानबोटे, गोरख शिंदे उपस्थित होते यावेळी

इंदापूर तालुक्यातील दिग्गज पत्रकारांचा वाढदिवस साजरा करण्यात आला काकासाहेब मांढरे सुधाकर बोराटे इम्तियाज मुलानी तात्याराम पवार तर कार्यकर्ते मयूर पाटील कृष्णाजी यादव सह इतर कार्यकर्त्यांचा ही वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...