मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

 इंदापूर :पाच हजार वर्षांपूर्वी  सुरू झालेली योगसाधना स्वामी रामदेवजी बाबांनी समाजापर्यंत पोहोचवली आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला जागतिक मान्यता प्राप्त करून दिली. नियमित योगा केल्याने शरीर आणि मन सदृढ होते शारीरिक क्षमता,सकारात्मकता, आत्मविश्वास वाढते आणि जीवन जगण्याचा आनंद घेता येतो उत्तम आरोग्य आणि दीर्घायुषी होण्यासाठी प्रत्येकाने रोज योगा करणे आवश्यक आहे इंदापूर मध्ये योगाची जनजागृती चांगली असून युवा सप्ताहाच्या माध्यमातून युवकापर्यंत योगा पोहोचवण्याचे काम कौतुकास्पद आहे या कार्यासाठी इंदापूर मध्ये अध्ययवत आणि सुसज्ज असे योग भवन उभारले जाणार असल्याचे मत माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी व्यक्त केले. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित युवायोग सप्ताह योगशिबीरामध्ये सहभागी होत झुंबा,योगसाधना करण्याचा आनंद हर्षवर्धन पाटील यांनी घेतला..
  यावेळी समाजभूषण डॉक्टर लक्ष्मण आसबे यांनी अष्टांग योगाची आठ अंगाविषयी विस्तृत विवेचन करीत उपस्थितांना जीवनात योग का करणे आवश्यक आहे याविषयी व्याख्यान दिले.
 युवा भारत राज्य कमिटी सदस्य प्रशांत गिड्डे युवा प्रभारी सचिन पवार अण्णासाहेब चोपडे रामेश्वरजी साठे यांनी योग प्राणायम प्रात्यक्षिकाचे  मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक अॅड.गिरीश शहा मा.नगरसेवक गोरख शिंदे उद्योजक मच्छिंद्र शेटे जलतज्ञ अनिल पाटील टोल प्लाजा चे मॅनेजर सतिश चव्हाण प्राचार्य जयंत नायकुडे ,रणजीत भोंगळे अॅड. जालिंदर बसळे, प्रशांत हेळकर या मान्यवरांसह विविध महाविद्यालयातील युवक युती आणि बहुसंख्येने योगसाधक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारत स्वाभिमान न्यासचे अध्यक्ष जयकुमार शिंदे बिभिषन खबाले पतंजली योग समितीचे अध्यक्ष मल्हारी घाडगे , काशिनाथ पारेकर, देवराव मते,हमीदभाई आत्तार, विकास खिलारे किसन पवार ,गोकुळ हराळे, शंकर काशीद,समाधान भोरकडे  मंगेश घाडगे प्रविण सदाफुले सायराभाभी आत्तार रेखाताई भंडारी जयश्री खबाले, अलका जगताप, यांनी परिश्रम घेतले. चंद्रकांत देवकर आणि राजेंद्र चव्हाण यांनी हा हास्यासन घेऊन सर्वांना मनसोक्त हसविले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र परबत यांनी तर आभार प्रदर्शन भालचंद्र भोसले यांनी केले.शांतिपाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...