मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर:- वाढत्या विषारी कीटकनाशक वापराच्या पार्श्वभूमीवर जैविक किड नियंत्रण काळाची गरज बनली आहे. कीटकनाशकांमुळे शेती उत्पादन विषय युक्त बनवून त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.मोठ्या प्रमाणात खर्च करू नये काही वेळेस कीड नियंत्रणात येत नाही .जैविक किड नियंत्रणात ट्रायकोकार्डचा वापर हा एक प्रभावी उपाय आहे. कृषी पदवीच्या आठव्या सत्रातील कार्यानुभवात्मक शिक्षण या अंतर्गत अमृता भिसे, आयुषी मित्तल, अनुप कुंघटकर व ऐश्वर्या शर्मा इत्यादी विद्यार्थी डॉ. न. द. तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली जैविक कीडनाशके तयार करण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यापैकी एक मित्र कीटक ट्रायकोग्रामा तयार केला जात असून तो विक्रीसाठी उपलब्ध आहे.अळीवर्गीय किडीच्या नियंत्रणामध्ये उपयुक्त ठरणारा ट्रायकोग्रामा हा एक परोपजीवी मित्र कीटक आहे.
# **विविध किडींवर नियंत्रण:-* 
१)प्रामुख्याने कापसावरील बोंड अळीची अंडी नाश करतो.
२) उसावरील खोडकिडा पतंगवर्गीय किडींचा नाश करतात .
३)टोमॅटो भेंडी वांग्यावरील फळ पोखरणारी अळी.
४)भुईमूग सूर्यफुलावरील अळी.
# *काय आहे ट्रायकोग्रामा:-* 
ट्रायकोग्रामा हा एक सूक्ष्म क्रीडा असून जवळपास 200 प्रकारच्या किडींच्या अंड्यांवर उपजीविका करतो. ट्रायकोग्रामा हा मित्र कीटक पिकांवरच्या किडींनी दिलेल्या अंड्यांमध्ये प्रवेश करून त्यातून अळी निघण्यापूर्वीच त्यांना नष्ट करतो.
 # *ट्रायकोग्रामाची कार्यपद्धती* :-
ट्रायकोग्रामा हा सूक्ष्म मित्र कीटक शेतात फिरून किडीच्या अंड्यांमध्ये स्वतःचे अंडे टाकतो.ट्रायकोग्रामाची 
१)अंडी अवस्था १६ ते २४ तास 
२)अळी अवस्था २ ते ३ दिवस
 ३)कोषावस्था दोन ते तीन दिवस 
४)७ व्या किंवा ८ व्या दिवशी ट्रायकोग्रामा शत्रू किडीच्या अंड्यातून बाहेर पडतो.
 प्रौढ ट्रायकोग्राम पुढे दोन ते तीन दिवस शेतात फिरून अळीवर्गीय किडीच्या अंड्यांचा शोध घेऊन त्यात आपली अंडी घालतो.अशा पद्धतीने हा शेतकऱ्यांना कीड नियंत्रणात मदत करतो.
# *ट्रायकोकार्ड चा वापर:-* 
१)पतंगवर्गीय किडींचा नाश करण्यासाठी पिकांवर एकरी २ ते ३ कार्ड्स १० ते १५ दिवसांनी २ ते ३ वेळा लावावे 
२)उसावरील खोडकिड्यावर एकरी चार ते पाच कार्ड्स दर दहा दिवसांनी आठ ते दहा वेळा लावावे.
३) कापूस पिकावरील बोंड अळ्यांसाठी एकरी २ ते ३ कार्ड्स दर १० दिवसांच्या अंतराने ४ ते ५ वेळा लावावे. 
*आपल्याला ज्यावेळी पिकांवर कीटकांची अंडी दिसतील त्यावेळी हे ट्रायको कार्ड पानाच्या मागच्या बाजूला जमिनीकडे करून झाडांना लावायचे .
*ट्रायको कार्डचे प्रसारण शेतामध्ये लावल्यानंतर रासायनिक कीडनाशकांचा वापर टाळावा.
* ट्रायको कार्ड हे 24 तासांच्या आत शेतामध्ये वापरावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...