इंदापूर:- जिजाऊ ब्रिगेड तर्फे -स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला,महिलांना रोजगारातील संधी उपलब्ध व्हाव्यात, बचत गटांचे महत्त्व कळावे,स्वतःच्या वस्तूला योग्य तो दाम मिळावा या हेतूने जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र तर्फे रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन समृद्धी गार्डन,यवत तालुका,दौंड,जिल्हा पुणे ठिकाणी येथे यशस्वीरित्या संपन्न झाला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे,प्रमुख मार्गदर्शक प्रदेश महासचिव स्नेहा खेडेकर,कार्याध्यक्ष नंदा शिंदे,जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष जयश्री गटकुळ, आम्रपाली धिवार,वैशाली नागवडे, निशा शेंडगे, रझिया तांबोळी, प्रा.डॉ. अंजली कदम, संजय व्यायाळ व वैशाली व्यायाळ, महेश पासलकर, वीरधवल जगदाळे, नितीन दोरगे, गणेश कदम,रोहन दोरगे, सरपंच समीर दोरगे, प्रा.सुधाकर फुले, जिजाऊ ब्रिगेड पंढरपूर विभाग अध्यक्षा सुरजाताई बोबडे, जगदीश ओहोळ,अमर हजारे, बिभीषण गदादे, शोभा जगताप,पिंपरी महानगरप्रमुख स्मिता म्हसकर, हवेली तालुकाध्यक्ष सुनीता गरड,बारामतीच्या अध्यक्ष विद्या चव्हाण चव्हाण,रश्मी सातपुते,विजयालक्ष्मी आळेगी,इंदापूर तालुका कार्याध्यक्ष राधिका शेळके,यवत जिजाऊ ब्रिगेडच्या उर्मिला दोरगे,पुष्पा खेडेकर,छाया चोबे,ईशा दोरगे,पुरंदर तालुकाध्यक्ष दुर्गा उरसळ, दौंड तालुका अध्यक्ष सारिका भुजबळ, मुळशी तालुकाध्यक्ष सायली शिंदे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली.जिजाऊ ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष नंदा शिंदे व पुणे जिल्हाध्यक्ष प्रा.जयश्री गटकुळ यांनी जिजाऊ वंदना गायन केली.
प्रास्ताविकातून जिजाऊ ब्रिगेड प्रदेश महासचिव स्नेहा खेडेकर यांनी महिलांनी चुल व मुल यात न अडकता बाह्य जगातील उद्योग व्यवसायात संधी शोधल्या पाहिजेत. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संकल्पनेतील तरुणींनी उद्योजक यांनी उद्योग व्यवसायातील तंत्र व मंत्र आत्मसात करणे गरजेचे आहे यासाठी झोकून घ्यावे असे सांगत जिजाऊ ब्रिगेडतर्फे भविष्यकाळात विविध प्रक्रिया उद्योगांवर भर देण्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगितले.
जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्याध्यक्ष नंदा शिंदे यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या वाटचाल सांगताना गाव-खेड्यावर काम करणारी व महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणारी जिजाऊ ब्रिगेड ही देशातील मोठी संघटना आहे.यात सहभागी होऊन आपल्या न्याय हक्कांसाठी लढा द्यावा असे सांगितले. एस.एन.डी.टी.कला व आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रा. अंजली कदम -नारायणे यांनी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झाल्याशिवाय महिला स्वयंपूर्ण होणार नाहीत यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी बचतगटांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. छोटे-मोठे उद्योगाला सुरुवात करून त्यातील कौशल्य आत्मसात करावे व विविध भागातील उद्योगाच्या संधी शोधाव्यात असे आवाहन केले.उद्योग व्यवसाय प्रशिक्षक प्रा.सुधाकर फुले यांनी शासनाचे विविध उद्योग व्यवसाय त्यासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानांची तसेच कर्ज योजनांची माहिती दिली.शासकीय महामंडळाच्या विविध योजना महिला बचत गट उद्योग व्यवसाय गट उभारणी व मार्केटिंग कौशल्य आत्मसात केल्यास महिला उंच भरारी घेऊ शकतील असा विश्वास व्यक्त केला. यासाठी महिलांनी उद्योगातील सातत्य आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
सुप्रसिद्ध उद्योजक
ईश्वेद बायोटेक कंपनीचे डायरेक्टर संजय वायाळ यांनी स्वतः उभारलेल्या उद्योग व्यवसायाची निर्मिती करताना मी शून्यातून उद्योगाची भरारी घेतली आहे.असे मत व्यक्त केले उद्योग व्यवसायात चढ-उतार सुरू असतात मात्र आपण खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असल्याचे सांगितले.
प्रसिद्ध उद्योजिका कमलताई परदेशी यांनी गाव खेड्यावर जिजाऊ ब्रिगेड महिलांना उद्योग व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण देत आहेत जगदीश अमर हजारे, बिभिशन गदादे,अमर हजारे यांनी विविध उद्योगातील संधी,कृषी पूरक उद्योग मार्केटिंग कौशल्य उद्योजकातील मानसिकता आणि यशस्वितेबाबत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणातून जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांनी राज्यभरात सामाजिक, राजकीय,उद्योजक क्षेत्रात महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडची वाटचाल सुरू आहे. असे मत व्यक्त केले . कर्तबगार महिला आणि सामजिक कार्यकर्त्यांचा मानचिन्ह, शाल देऊन सन्मान करण्यात आला. तहसीलदार संजय पाटील,पोलीस निरीक्षक नारायण पवार, जिजाऊ ब्रिगेडच्या दौंड तालुकाध्यक्ष सारिका भुजबळ व भरत भुजबळ समृध्दी गार्डन लॉन्सचे विश्वस्त संजय शहा,बाशिर शेख,प्रशांत दिवेकर यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती भदाणे यांनी केले आभार जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष सारिका भुजबळ यांनी मानले.
टिप्पण्या