मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज


श्री.संत गुलाबबाबा मंदिर धामाच्या विकास कामासाठी आणि भक्तांच्या सेवेसाठी तत्पर - नूतन अध्यक्ष नरेंद्र पालांदुरकर
 
श्री संत गुलाबबाबा संस्थान काटेलच्या
     संचालक मंडळाची बिनविरोध निवड,मावळते अध्यक्ष सोनूमामा भाटिया यांनी दिले नूतन संचालक मंडळाला आशीर्वाद

 इंदापूर:-श्री संत गुलाबबाबा संस्थान काटेल येथे २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी नवनियुक्त संचालक मंडळाची बिन विरोध निवड झाली.बुलढाणा जिल्ह्यातील काटेल धाम हे गाव म्हणजे श्री संत गुलाब बाबांची कर्मभूमी असून हे काटेल गाव म्हणजे ते गाव होय, ज्याची सद्गुरु गुलाब बाबांनी निवास करण्यासाठी स्वतः निवड केली. सन १९५८ नंतर सद्गुरु गुलाब बाबांचा सगळ्यात जास्त जिथे सहवास राहिला ते गाव म्हणजे काटेल धाम होय.
 

 काटेल गावातील आश्रमात सद्गुरु गुलाब बाबांचे खरे निवास स्थान म्हणजे झोपडी, बाबाजींनी भक्तांच्या दुःख निवारणासाठी स्वतः खोदलेले चमत्कारी अमृतकुंड, कचेरी नदीचा अद्भुत घाट ज्या ठिकाणी बाबजींनी दीन- दुबळ्या भोळ्या भक्तांसोबत दहीहंडी उत्सव साजरा केला व गोपाळ काला गोड केला. तसेच सद्गुरु गुलाब बाबाजींच्या अमृतवानीने दुमदुअमलेला असंख्य भजन - कीर्तनाचा साक्षी असलेला साई-सभामंडप, सद्गुरु गुलाब बाबांचे भव्य दिव्य मंदिर, तीन औदुंबर, पाच औदुंबर आणि अनेक मंदिरांनी साजेलेले हे काटेल आश्रम एकूण ५६ एकरात विस्तारले आहे.


 नव- नियुक्त विश्वस्त मंडळ हे काटेल आश्रमाच्या विकासासाठी बांधील राहील आणि नक्कीच श्री संत गुलाब बाबांच्या काटेल आश्रमाचे नंदनवन करण्यासाठी एका नव्या उर्मिने, नव्या जोशाने काम करणार असल्याचे नूतन अध्यक्ष नरेंद्र  पालांदुरकर यांनी पत्रकारांशी बोलताना  सांगितले. ते पुढे म्हणाले की,काटेल येथील श्री संत गुलाब बाबांचे भव्य मंदिराचे काम सन २०२५ पर्यंत पूर्ण करणे, काटेल येथे भक्तांसाठी नवीन भव्य भक्तनिवास उभारणे, काटेल आश्रमाचे सुशोभीकरण करणे, नवीन व उत्कृष्ठ भोजनगृह निर्माण करणे तसेच काटेल येथे येणाऱ्या भक्तांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी काम करणार.

तसेच सद्गुरु श्री संत गुलाब बाबांच्या जन्म शताब्दी वर्ष म्हणजे सन २०३२ पर्यंत संकल्पक वृत्तीने नवनियुक्त संचालक मंडळ काम करणार.सद्गुरु गुलाब बाबांचा आशिर्वाद व भक्तमंडळीचे प्रेम असेच सदैव टिकून राहिले ते निश्चितच येणाऱ्या पाच वर्षात काटेल आश्रमाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले.

*नवनियुक्त संचालक मंडळ पदाधिकारी पुढील प्रमाणे*

मुख्य मार्गदर्शक- सोनुमामा भाटिया,नरेंद्र बबनराव पालांदुरकर,(भंडारा)
नूतन अध्यक्ष, मिलिंद वामन खेर्डीकर,(औरंगाबाद) सदस्य, धनंजय शिवराम घाग, (मुंबई)सचिव, बाजीराव भास्कर भाटिया, (सोनवद)सदस्य, मनोहर महादेव कुकडे, (काटेल)सदस्य, अरुण मथुरादास भाटिया, (धरणगाव)सदस्य, विठ्ठल पुंडलिक टाकळकर, (दानापूर)सदस्य, नरहरी गुलाबराव आढाव, (काकणवाडा)सदस्य, ध्रुव डाबेराव(कोलद)सदस्य,
 गजानन श्रीराम खडसे, (काटेल)सदस्य,दिगंबर सारंगधर कुकडे, (काटेल)सदस्य, रवींद्र सहादू पाटील, (धुळे)
सदस्य, बाबासाहेब एकनाथ मांडलिक, (सोनई)सदस्य, भाईदास भगवान पाटील, (नंदुरबार)सदस्य
----------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते