मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

ग्रामविकास कृषी जिल्हा स्तरीय कृषि व औद्योगिक प्रदर्शन २०२२ दि.23  ते 27 नोव्हेंबर,रोजी-सिमाताई कल्याणकर

इंदापूर:- 10 वे ग्रामविकास कृषी प्रदर्शन
इंदापूर तालुका, अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेले स्थान सधन,शेतकरी, सोलापूर, नगर, पुणे, सातारा या चारही जिल्ह्यांना जवळ असणारे, ग्रामीण व शहरी संस्कृतीची अपूर्व संगम, भरभराटीची कृषि औद्योगिक बाजारपेठ,सहकार चळवळीतून साधलेले समृद्ध औद्योगिकरण, येथील व्यवहारीक हुशार
शेतकरी, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन घेण्यासाठी आतुर असलेला तरुण वर्ग,राजकिय, सामाजिक जबाबदारी व कर्तव्याचे भान असलेला नागरीक ग्रामविकास कृषि या प्रदर्शनाचे स्वागत उत्सुकतेने करत आहे. सुमारे २ लाख लोकांची या
प्रदर्शनास भेट अपेक्षित आहे. त्यामुळे  10 वे कृषि प्रदर्शन हे एक उत्तम व्यासपीठ
मिळवून देणार यात कोणतीही शंका नाही. येथील शेतकऱ्याशी आपला थेट होणारा
संवाद या निमित्ताने साधत आहोत.
विकासधारा मंच  ही सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक महिला सक्षमीकरण स्वयंरोजगार, व्यावसायिक,प्रशिक्षण आदी क्षेत्रात भरीव काम करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करीत
आहे. ग्रामविकास कृषी जिल्हा स्तरीय कृषि व औद्योगिक प्रदर्शन २०२२ दिनांक
23  ते 27 नोव्हेंबर २०२२ रोजी इंदापूर, ता. इंदापूर , जि. पुणे महत्त्वकांक्षी
आयोजन करु पाहत आहे. या निमित्ताने परिसरातील शेतकऱ्यामध्ये नवतंत्रज्ञानाची
ओळख व्हावी. ही संकल्पना त्यामागे आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषि
कल्याणकारी योजनांची माहिती या माध्यमातून मिळणार आहे. त्याचबरोबर महिला
बचत गटाच्या उत्पादनांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम या प्रदर्शनात होणार
आहे. या हेतूने या प्रदर्शनाची संकल्पना मांडत आहे. भविष्यात असे अनेक विविध
समाज उपयोगी उपक्रमाची नांदी या निमित्ताने होत आहे.या उपक्रमास सुरुवात करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. यामध्ये,खाजगी संस्था, शासन, स्वयंसेवी संस्था व स्वयंसेवक यांचा सहभाग लाभेल ही,अपेक्षा.या प्रदर्शनांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन सौ.सीमा प्रशांत कल्याणकर अध्यक्ष विकासधारा मंच यांनी केले आहे, 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...