मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज


इंदापूर :- तालुक्याचे आधारवड, कल्पतरू नेतृत्व असलेले ज्येष्ठ गांधीवादी नेते गोकुळ दास शहा उर्फ भाई ( वय ८७ ) हे दिनांक १० सप्टेंबर रोजी सकाळी ६.१५ मिनिटांनी पंचतत्वात विलीन झाले. त्यांच्या निधनामुळे इंदापूर शहरात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.पूर्वी इंदापूर व आता कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक उपाध्यक्ष होते तर इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष तसेच सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. श्री नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सलग तीस वर्ष हजारो हुशार, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले. काही अपंगाना त्यांनी जयपूर फूट दिले तर काही लोकांच्या टॉन्सिल व महिलांच्या शस्त्रक्रिया ट्रस्टच्या माध्यमातून मोफत केल्या. त्यांनी अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत केली. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूर येथे आणण्यात तसेच सोहळ्याची सेवा करण्यात ते नेहमी आघाडीवर असत. त्यांच्यावर स्वातंत्र्यसैनिक स्व. नारायणदास रामदास शहा शेठ यांचे संस्कार होते. त्यामुळे तालुक्यात शेती, सहकार, शिक्षण, आरोग्य, व्यापार, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना दैनिक सकाळ माध्यम समूह तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सन्मानित करण्यात आले होते. माजी खासदार कै. शंकरराव पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांना ओळखले जात होते. त्यांच्या आर्थिक शिस्तीमुळे कर्मयोगी कारखान्याने सलग तीन वर्ष सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार मिळवला होता. स्व. शंकरराव पाटील हे कारखान्यात आर्थिक व्यवस्थापनामध्ये त्यांचा शब्द अंतिम मानत असत. यावरून त्यांच्या कार्याचे महत्त्व पटते.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूनबाई अंकिता मुकुंद शहा या इंदापूर शहराच्या नगराध्यक्षा बनल्या. त्यांनी नगर परिषदेस स्वच्छता अभियानात सलग चार वर्ष राष्ट्रीय पातळीवर पोहचवले. त्यांच्या कार्याचे संस्कार घेवून त्यांचे चिरंजीव मुकुंद शहा यांनी कर्मयोगी कारखान्याचे संचालक तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव म्हणून लक्षवेधी कामगिरी केली तर पुतणे भरत शहा यांनी त्यांचा आदर्श घेवून इंदापूर अर्बन सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून चांगले योगदान दिले तर इंदापूर नगरपरिषदेचे नगरसेवक तसेच कर्मयोगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून चांगले योगदान देत आहेत. नातू निनाद हा अमेरिकेत उद्योजक म्हणून तर अंगद हा शेती पूरक उद्योजक म्हणून पुढे येत आहे. त्यांच्या निधनामुळे शहर व तालुक्यातील सच्चा व परखड नेता हरपला, बळीराजाचा आधार गेला. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संचलित पुणे जिल्हा व इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघ, इंदापूर जिल्हा पुणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते