मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

शहरातील, दवाखाना,शाळा, कॉलेज, तहसिलदार कचेरी, रस्ते, वीज, पाणी, सर्वच क्षेत्रात मोठे फेरबदल करून इंदापूर चा दत्तात्रय भरणे यांनी चेहराच बदलला- खा.सुप्रियाताई सुळे

इंदापूर ;- शहरातील, दवाखाना,शाळा, कॉलेज, तहसिलदार कचेरी, रस्ते, वीज, पाणी, सर्वच क्षेत्रात मोठे फेरबदल करून दत्तात्रय भरणे यांनी
 एक आदर्श शहर कसं असावं तर नावाला स्मार्ट नाही तर आम्ही प्रत्यक्ष कृतीमध्ये स्मार्ट आहोत असे काम इंदापूरमध्ये झालेले आहे.मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या कामाची दखल महाराष्ट्राचं नव्हे तर देश घेईल,मी करून संसदेत जेव्हा भाषण करेल तेव्हा या आदर्श शहराचा आवर्जून उल्लेख करेल.आदर्श शहर कसं असावं हे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगेल की तुम्ही पण इंदापूर ला या ! आणि चार गोष्टी आम्ही तुम्हाला सुचवतो कारण देश चालवत असताना आपण चांगल्या चांगल्या गोष्टी शिकत असतो म्हणत इंदापूर हे देशात आदर्श शहर होऊ पाहत असून त्या वेगाने बदल घडतो आहे अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांची पाठ थोपाटली आहे.

इंदापूर शहरातील आय.टी.आय. इमारत नवीन वर्ग खोल्या, तहसील कार्यालयातील अभिलेख कक्ष सेतू कार्यालय , इंदापूर शहर अंतर्गत चौक सुशोभिकरण व अंतर्गत पथदिवे तसेच वीरश्री मालोजीराजे भोसले चौकातील सुशोभिकरण या सह विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सौ.सुप्रिया सुळे यांच्या शुभहस्ते व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत रविवारी दि.१७ एप्रिल रोजी पार पडले यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सर्व आजी माजी पदाधिकारी,नगरसेवक,कार्यकर्ते उपस्थित होते.

सुळे पुढे म्हणाल्या की,नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन इंदापूरचा जो चेहरामोहरा बदलला आहे.ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे.दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरची उंची वाढवली आहे.काळ बदलत चालला आहे लोकांच्या गरजा वाढत आहेत. स्वच्छता पाणी,वीज याबरोबर शहराचे सुशोभिकरण करुन हे स्वच्छ शहर ठेवणे हे ज्याची सत्ता आहे त्याची ती नैतिक जबाबदारी

आहे.दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा परिषद मधूनचं त्यांचे काम दाखवण्यास सुरवात केली.त्यांचे काम पाहुन पक्षाने त्यांना मंत्रीपद दिले.एखाद्या मंत्र्याचा मतदार संघ कसा असतो हे त्यांनी दाखवून दिले.राज्यमंत्री असताना असं आहे मगं कॅबिनेट झाले तर काय करतील अशा शब्दात सुळे यांनी भरणे यांच्या कार्याचे कौतुक केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...