मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

  
 इंदापूर येथील रस्ता रोको आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,
 इंदापूर:-महाविकास आघाडी सरकारने शेतीपंपांचा वीजपुरवठा अनेक दिवसांपासून खंडित केला आहे. त्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होत असून, सक्तीच्या वीज बिल वसुलीसाठी शेतकर्‍यांना मानसिक त्रास दिला जात आहे. इंदापूर तालुक्यात वीजे अभावी शेती पिके जळून चालल्याने शेती पंपांचा वीजपुरवठा तात्काळ  चालू करावा, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली इंदापूर येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (दि. 8 ) सकाळी 10.30 वा. रास्ता रोको आंदोलन होणार आहे. 
     या आंदोलनामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश घोलप हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
     मंत्र्यांकडून वीज तोडण्याचे आदेश दिले जात आहेत. शेतकऱ्यांना मोफत वीज द्या म्हणणारेच सध्या सत्तेवर आहेत, तेच आता बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा चुकीच्या पद्धतीने  खंडित करीत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या वीज तोडणी मोहिमेच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन होणार आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
     ते म्हणाले, शेतकऱ्यांना मदत करणे, आधार देणे हे राज्य शासनाचे कर्तव्य असते. मात्र शेतकर्‍यांना खिंडीत गाठून, पिके जाळून व शेतकऱ्यांचे नाक-तोंड दाबून सध्याचे महाविकास आघाडीचे सरकार शेतीपंपांची वीज बिल वसुली जबरदस्तीने कोणताही नियम न पाळता करीत आहे हे निषेधार्ह आहे.
   इंदापूर तालुक्याच्या शेजारील तालुक्यांमध्ये शेतीचा वीजपुरवठा सुरू आहे, मग इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय का? इंदापूरचे लोकप्रतिनिधी असलेल्या मंत्र्यांचा वीज तोडणी मोहिमेला पाठिंबा आहे. त्यामुळे ते वीज पुरवठा सुरु व्हावा, संदर्भात एकही शब्द बोलत नाहीत, मुग गिळून गप्प आहेत. महावितरणने शेतकऱ्यांना दिलेली बिले अव्वाच्या सव्वा आलेली असून अनेक हॉर्स पावरने वाढवून आलेली आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. वीज पुरवठा खंडित केल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, याला जबाबदार कोण आहे, याची जाणीव आता त्रस्त शेतकऱ्यांना झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.
      इंदापूर तालुक्यातील शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडित केल्याने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी मंगळवारी होणाऱ्या इंदापूर येथील रस्ता रोको आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार व शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी केले आहे.
* चौकट :-
 फडणवीस सरकारने एकदाही वीज तोडली नाही- हर्षवर्धन पाटील 
------------------------------------------
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या राज्य सरकारने 5 वर्षे सत्तेवर असताना शेतकऱ्यांची एकदाही वीज तोडली नाही. उलट सध्याचे महाविकास आघाडी सरकार हे ठरवून प्रत्येकी तीन ते चार महिन्याला अडचणीतील शेतकऱ्यांना खिंडीत गाठून सक्तीने व अन्यायकारक पद्धतीने वीज बिलाची वसुली करीत आहे. शेतकऱ्यांवर होणारा हा अन्याय भाजप थांबवेल, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
         ______________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते