मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

महाशिवरात्रीचे औचित्य साधून पुरातन काशीविश्वेश्वर महादेव मंदिराच्या रंगरंगोटी साठी केला साठ हजार खर्च

इंदापूरः तालुक्यातील रेडा गावामध्ये गेली कित्येक दशकापासून पुरातन काशी विश्वेश्वर महादेव मंदिर आहे आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार सन २००८ साली स्व. सूर्यकांत दगडू गुळवे यांनी लाखो रुपये खर्च करून केला होता.अनेक वर्षापासून पुरातन काशी विश्वेश्वर महादेव मंदिर हे रेडा गावात एक जागृत देवस्थान आहे. आपल्या स्व. आजोबाची सामाजिक बांधिलकी वसा, परंपरा ही नातू विक्रांतशेठ गुळवे यांनी पुढे जोपासत चालू ठेवली आहे. त्यांनी  काशिविश्वेश्वर मंदिराच्या रंगरंगोटी  व टाईल्स फरशी साठी तब्बल ६० हजार रुपये खर्च केला आहे. ही परंपरा या वर्षी महाशिवरात्रीचे औचित्य साधून मंदिर परिसरात मध्ये अतिशय सुंदर पद्धतीने वृक्षारोपण केले.गुळवे परिवाराची ही सामाजिक बांधिलकी रेडा परिसरातील आजूबाजूच्या गावातील व इंदापूर तालुक्यात सुद्धा लौकिक असून धार्मिक ,सामाजिक उपक्रम राबवून बांधिलकी जपणारे कुटुंब , परिवार म्हणून त्यांची ओळख आहे. तीच परंपरा पुढे चालवत आहेत. 

वडील सोमेश्वर सूर्यकांत गुळवे चे प्रसिद्ध किराणा मालाचे व्यापारी व प्रगतशील बागायतदार म्हणून ओळखले जातात आणि  चुलते अँड. नागेश सूर्यकांत गुळवे पुणे येथे प्रसिद्ध वकील असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम, कार्यक्रम राबवत असतात.या वृक्षारोपणासाठी विक्रांतशेठ गुळवे, रेडा ग्रामपंचायत सदस्य धनंजय गायकवाड, रेडा विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन , माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर देवकर, महादेव रघुनाथ देवकर - पाटील , धीरज देवकर ,सुशांत देवकर ,अशिष  देवकर, श्रीपाद साखरे,  हनमंत कोळेकर, गणेश वाघ, आदित्य मोहिते, नागेश कानगुडे, योगेश ज्योतीराम देवकर, भैया मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

--------

 चौकट:-

 *वृक्षारोपण ही काळाची गरज -  विक्रांतशेठ गुळवे*

 सध्या जागतिक पर्यावरण समतोल ढासळत चाललेला असून जगाला समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ऐनवेळी पाऊस आणि दुष्काळ असे अनेक सध्या अनुभव नागरिकांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे मानवी जीवनावरती विपरीत परिणाम होत आहेत. निसर्ग समतोल जपला किंवा निसर्गाला जोपासलं तर मानवी जीवन समतोल राहील आणि मानवाचे जीवन ही सुरक्षित राहील.त्यामुळे वृक्षारोपण ही काळाची गरज आहे असे मत त्यांनी आपले व्यक्त केले. विक्रमशेठ गुळवे यांच्या संकल्पनेतून व बाबुराव पवार यांच्या सहकार्यातून विविध प्रकारच्या पन्नास झाडांचे वृक्षारोपण करून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...