मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

महाशिवरात्रीचे औचित्य साधून पुरातन काशीविश्वेश्वर महादेव मंदिराच्या रंगरंगोटी साठी केला साठ हजार खर्च

इंदापूरः तालुक्यातील रेडा गावामध्ये गेली कित्येक दशकापासून पुरातन काशी विश्वेश्वर महादेव मंदिर आहे आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार सन २००८ साली स्व. सूर्यकांत दगडू गुळवे यांनी लाखो रुपये खर्च करून केला होता.अनेक वर्षापासून पुरातन काशी विश्वेश्वर महादेव मंदिर हे रेडा गावात एक जागृत देवस्थान आहे. आपल्या स्व. आजोबाची सामाजिक बांधिलकी वसा, परंपरा ही नातू विक्रांतशेठ गुळवे यांनी पुढे जोपासत चालू ठेवली आहे. त्यांनी  काशिविश्वेश्वर मंदिराच्या रंगरंगोटी  व टाईल्स फरशी साठी तब्बल ६० हजार रुपये खर्च केला आहे. ही परंपरा या वर्षी महाशिवरात्रीचे औचित्य साधून मंदिर परिसरात मध्ये अतिशय सुंदर पद्धतीने वृक्षारोपण केले.गुळवे परिवाराची ही सामाजिक बांधिलकी रेडा परिसरातील आजूबाजूच्या गावातील व इंदापूर तालुक्यात सुद्धा लौकिक असून धार्मिक ,सामाजिक उपक्रम राबवून बांधिलकी जपणारे कुटुंब , परिवार म्हणून त्यांची ओळख आहे. तीच परंपरा पुढे चालवत आहेत. 

वडील सोमेश्वर सूर्यकांत गुळवे चे प्रसिद्ध किराणा मालाचे व्यापारी व प्रगतशील बागायतदार म्हणून ओळखले जातात आणि  चुलते अँड. नागेश सूर्यकांत गुळवे पुणे येथे प्रसिद्ध वकील असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम, कार्यक्रम राबवत असतात.या वृक्षारोपणासाठी विक्रांतशेठ गुळवे, रेडा ग्रामपंचायत सदस्य धनंजय गायकवाड, रेडा विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन , माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर देवकर, महादेव रघुनाथ देवकर - पाटील , धीरज देवकर ,सुशांत देवकर ,अशिष  देवकर, श्रीपाद साखरे,  हनमंत कोळेकर, गणेश वाघ, आदित्य मोहिते, नागेश कानगुडे, योगेश ज्योतीराम देवकर, भैया मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

--------

 चौकट:-

 *वृक्षारोपण ही काळाची गरज -  विक्रांतशेठ गुळवे*

 सध्या जागतिक पर्यावरण समतोल ढासळत चाललेला असून जगाला समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ऐनवेळी पाऊस आणि दुष्काळ असे अनेक सध्या अनुभव नागरिकांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे मानवी जीवनावरती विपरीत परिणाम होत आहेत. निसर्ग समतोल जपला किंवा निसर्गाला जोपासलं तर मानवी जीवन समतोल राहील आणि मानवाचे जीवन ही सुरक्षित राहील.त्यामुळे वृक्षारोपण ही काळाची गरज आहे असे मत त्यांनी आपले व्यक्त केले. विक्रमशेठ गुळवे यांच्या संकल्पनेतून व बाबुराव पवार यांच्या सहकार्यातून विविध प्रकारच्या पन्नास झाडांचे वृक्षारोपण करून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते