मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

मध्यान्ह भोजन योजनेच्या अनुदानात १०० % वाढ करण्या साठी मा .ना .श्रीमती निर्मला सीतारमन अर्थमंत्री यांना राष्ट्रसेवा दला चे निवेदन

इंदापूर:-मध्यान्ह भोजन योजनेतील अनुदानात १०० % वाढ करण्या साठी मा . ना . श्रीमती निर्मला सीतारमन अर्थमंत्री , भारत सरकार यांना राष्ट्रसेवा दला चे निवेदन पाठविण्यात आले, त्या निवेदनाची प्रत तहसीलदार श्रीकांत पाटील इंदापूर यांना देण्यात आले,या निवेदनात विविध विषय मांडण्यात आलेआसल्याची माहीती राष्ट्रसेवादलाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कृष्णाजी ताटे सर यांनी दिली ते पुढे म्हणाले की,
देशातील शाळा - शाळांमधून मुला - मुलींची उपस्थिती वाढावी , गळती थांबावी आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी भारत सरकाने MDM मध्यान्ह भोजन योजना सुरु केलेली आहे . ही योजना आता प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण या नावाने सुरु होत आहे . केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ या अंदाज पत्रकात या योजनेस १०० % अनुदानाची तरतुद केलेली दिसून येत नाही . उलट कपातच झालेली आहे , ही गंभीर बाब आहे . बहुजन , कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील बहुसंख्य मुलं या योजनेमुळे शिक्षणाच्या प्रवाहात टिकून आहेत . मात्र अनुदानात कपात झाल्याने ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जाण्याचा धोका निर्माण होतो . तसेच महाराष्ट्रातील आश्रम शाळा अनुदानित वसतिगृहे यांच्यासाठी नारी निकेतन योजनेअंतर्गत गहू , तांदूळ शासनाकडून मिळत होता तो , ई मशीन च्या नावाखाली बंद आहे तो पूर्ववत चालू करावा . तरी कृपया प्रधानमंत्र्यांच्या नावाने सुरु होत असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेस १०० % अनुदानाची तरतुद करण्यात यावी,आशी मागणी राष्ट्रसेवादलाच्या वतीने करण्यात आली, या वेळी सेवादल मंडळ सदस्य कृष्णाजी ताटे सर,मार्गदर्शक साथी सलिम शेख, राष्ट्र सेवा दल राज्य कार्यकारिणी सदस्य (महाराष्ट्र) मा.गफूरभाई सय्यद,जिल्हा कोशाध्यक्ष बिभीषण लोखंडे, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश शिंदे,उपस्थित होते,
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा संघटक शिवाजीराव मखरे, शिवशाही शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन दादा आरडे, समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पोळ, वंचित बहुजन आघाडीचे हनुमंतराव कांबळे, प्रमोद चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार, मौर्य क्रांती संघ शहराध्यक्ष प्रकाश पवार,अमोलशेठ मिसाळ,सुनील सोनवणे सह इतर मान्यवर उपस्थित होते, 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...