मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

मध्यान्ह भोजन योजनेच्या अनुदानात १०० % वाढ करण्या साठी मा .ना .श्रीमती निर्मला सीतारमन अर्थमंत्री यांना राष्ट्रसेवा दला चे निवेदन

इंदापूर:-मध्यान्ह भोजन योजनेतील अनुदानात १०० % वाढ करण्या साठी मा . ना . श्रीमती निर्मला सीतारमन अर्थमंत्री , भारत सरकार यांना राष्ट्रसेवा दला चे निवेदन पाठविण्यात आले, त्या निवेदनाची प्रत तहसीलदार श्रीकांत पाटील इंदापूर यांना देण्यात आले,या निवेदनात विविध विषय मांडण्यात आलेआसल्याची माहीती राष्ट्रसेवादलाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कृष्णाजी ताटे सर यांनी दिली ते पुढे म्हणाले की,
देशातील शाळा - शाळांमधून मुला - मुलींची उपस्थिती वाढावी , गळती थांबावी आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी भारत सरकाने MDM मध्यान्ह भोजन योजना सुरु केलेली आहे . ही योजना आता प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण या नावाने सुरु होत आहे . केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ या अंदाज पत्रकात या योजनेस १०० % अनुदानाची तरतुद केलेली दिसून येत नाही . उलट कपातच झालेली आहे , ही गंभीर बाब आहे . बहुजन , कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील बहुसंख्य मुलं या योजनेमुळे शिक्षणाच्या प्रवाहात टिकून आहेत . मात्र अनुदानात कपात झाल्याने ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जाण्याचा धोका निर्माण होतो . तसेच महाराष्ट्रातील आश्रम शाळा अनुदानित वसतिगृहे यांच्यासाठी नारी निकेतन योजनेअंतर्गत गहू , तांदूळ शासनाकडून मिळत होता तो , ई मशीन च्या नावाखाली बंद आहे तो पूर्ववत चालू करावा . तरी कृपया प्रधानमंत्र्यांच्या नावाने सुरु होत असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेस १०० % अनुदानाची तरतुद करण्यात यावी,आशी मागणी राष्ट्रसेवादलाच्या वतीने करण्यात आली, या वेळी सेवादल मंडळ सदस्य कृष्णाजी ताटे सर,मार्गदर्शक साथी सलिम शेख, राष्ट्र सेवा दल राज्य कार्यकारिणी सदस्य (महाराष्ट्र) मा.गफूरभाई सय्यद,जिल्हा कोशाध्यक्ष बिभीषण लोखंडे, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश शिंदे,उपस्थित होते,
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा संघटक शिवाजीराव मखरे, शिवशाही शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन दादा आरडे, समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पोळ, वंचित बहुजन आघाडीचे हनुमंतराव कांबळे, प्रमोद चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार, मौर्य क्रांती संघ शहराध्यक्ष प्रकाश पवार,अमोलशेठ मिसाळ,सुनील सोनवणे सह इतर मान्यवर उपस्थित होते, 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते