मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज


लासुर्णे येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत 
बहुजन मुक्ती पार्टी चा कार्यकर्ता मेळावा-अॅड,राहूल मखरे 
 इंदापूर :-बहुजन मुक्ती पार्टी चा कार्यकर्ता मेळावा दि. 05 सप्टेंबर 2021 रोजी  लासुर्णे येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी अध्यक्षीय भाषण करताना अॅड. राहुलजी मखरे यांनी काँग्रेस, भाजप व तत्सम पक्षातून निवडून गेलेले प्रतिनिधी हे समाजाच्या मतावर निवडून गेले असले तरी ते समाजाच्या हितासाठी काम करत नाहीत. कारण त्यांना पक्षाने तिकीट दिलेले असते. पक्षाचे अजेंडे समाजविरोधी आहेत हे माहीत असले तरी ते पक्षाचे विरोधात जाऊन समाजहिताचे निर्णय घेऊ शकत नाहीत. 
कारण पुढील निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारली जाईल अशी भीती असते. पक्ष जे सांगेल ते काम सालाने ठेवलेल्या गड्यासारखे करायचे,एवढीच त्यांची भूमिका असते. परंतु, बहुजन मुक्ती पार्टीची सत्ता आल्यावर समाजाच्या समस्या सोडविण्याचे, समाजाच्या हिताचे बोलण्याचा आणि समाजाच्या हिताचे निर्णय घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य लोकप्रतिनिधींना देण्यात येईल. कारण आम्ही पक्षाचे समर्थक नाही, आम्ही जनतेचे समर्थक आहोत. त्यामुळे आमच्या पक्षाचे ब्रीद "जनतेची... जनतेद्वारा... जनतेसाठी" असे आहे, असे ते म्हणाले.
बहुजन मुक्ती पार्टी चे प्रदेशाध्यक्ष मा. श्रीकांत दादा होवाळ साहेब ओबीसी आरक्षणावर बोलताना म्हणाले की, काँग्रेस आणि भाजप हे ओबीसींच्या आरक्षणाच्या विरोधात आहे. जर त्यांना आरक्षण द्यायचे असते तर यापुर्वीच दिले असते. परंतु, हे ओबीसींना आरक्षण विषयी चुकीची माहिती देऊन त्यांच्या मधे आरक्षण विषयी गैरसमज पसरवत आहेत.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे लोकसभा प्रतिनिधि महाराष्ट्राच्या बाहेर नाहीत, शिवसेनेचे नाहीत. त्यामुळे संसदेत यांचा प्रभाव पडत नाही. पुरोगामीत्वाची कातडी पांघरूण बहुजन समाजाला फसवण्याचे काम या पक्षांकडून होत आहे. बहुजन मुक्ती पार्टीची देशात सत्ता आली तर लोकसंख्येच्या प्रमाणात 100% आरक्षण लागू करण्यात येईल. असेही ते म्हणाले.
यावेळी मा. अमोल लोंढे (अध्यक्ष - बीएमपी युवा आघाडी बीएमपी पश्चिम महाराष्ट्र), तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोंग, युवा अध्यक्ष मा. राहुल शिंगाडे. काजल उकिरडे महिला आघाडीच्या अध्यक्षा, पोपट आठवले (कार्याध्यक्ष - बीएमपी), संतोष क्षीरसागर (शहराध्यक्ष) संतोष कांबळे, विष्णु आप्पा चव्हाण, नेताजी लोंढे, संजय डोनाल्ड शिंदे, बहुजन मुक्ती पार्टी चे हजारों कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बहुजन समाज पार्टी चे मा. तालुकाध्यक्ष महेश लोंढे आणि पीआरपीचे कळसचे कार्यकर्ते मा. अतुल कांबळे यांनी बहुजन मुक्ती पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते