मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर:-  महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात मराठा आरक्षण  विषयांवर  चर्चा सुरू आहे . समाजातील वातावरण दुषित करण्यासाठी काही अवगुणी मंडळी , संघटना व तत्सम इतर काही राजकीय मंडळी  यासाठी कार्यरत आहेत . समाजात संभ्रम व गैरसमज निर्माण  करतात . मराठा आणि इतर समाजात  वाद निर्माण केले जातात, मराठा समाजानेच दबाव आणून पदोन्नती मधील आरक्षण व स्थानिक स्वराज्य संस्था मधील ओबीसी आरक्षण रद्द केले आहे असे गैरसमज पसरवले जात आहेत. ते सामाजिक संबंध बिघडवण्यासाठी वापरले जात आहेत. आपल्या अधिकारांसाठी कायदेशीर लढा देत आपसातील मतभेद समजून घेत सामाजिक बंधुभाव, एकात्मता व शांतता राखावी. मराठा आरक्षण  सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केलेले आहे मराठा आरक्षण लढा जातीय स्वरुपाचा नाही  तर उलट जातीय सलोखाचा आहे. 
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण स्थगित केले असल्यामुळे राज्यातील सामाजिक वातावरण दुषित झाले आहे .यासाठी काही राजकीय नेत्यांची अनास्था कारणीभूत आहे . मराठा, एससी , एसटी व ओबीसी वर्गात आपसात भांडणे लावण्याचा प्रयत्न  काही राजकीय  नेते करत आहेत. मराठा समाजातील युवकांनी मानसिकता बदलू न देता सामंजस्याची भूमिका घेत बंधुभाव, एकात्मता  यांचा आदर  करुन शांतता आणि संयम बाळगून कायदेशीर मार्गाने लढा देत सहकार्य करावे हे नम्र आवाहन पुणे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने  करत आहे.
छत्रपती संभाजी राजे यांनी केलेल्या आवाहन नुसार कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर, रायगड आणि अमरावती या ठिकाणाहून दिनांक 16 जून 2021 पासून मुकआंदोलन करण्यात येईल, कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळात लोक कोरोनाशी लढत आहेत जीवन-मरणाचा प्रश्न समोर उभा आहे अशा सद्य परिस्थितीचा विचार करून शासनाने मराठा आरक्षणचा  निर्णय घेऊन  मराठा समाजाबाबत  सकारात्मक भूमिका घ्यावी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...